AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त

आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की अशा काही गोष्टी असतात, ज्या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहिलं पाहिजे, कितीही मोह झाला तरी तुम्ही या गोष्टीच्या कधीही नादी लागू नये. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 8:54 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात वावरत असताना तुम्हाला तुमचं प्रत्येक पाऊल हे खूप काळजीपूर्वक टाकावं लागतं. जर तुमचं एखादं पाऊल जरी वाकडं पडलं तरी देखील तुमचं तर नुकसान होतंच परंतु तुमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशा काही गोष्टी असतात, ज्याच्यापासून मानसाने नेहमी दूर राहिलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

व्यसन – चाणक्य म्हणतात व्यसन कुठलंही असो, दारूचं असो अथवा अन्य कोणतंही जर एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला तरी त्याच्या संसाराचं वाटोळ होतं. असा माणून पैशांसाठी आपलं घरदार विकण्यास देखील मागं पुढे पहात नाहीत. अशा माणसाच्या मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, कष्ट करावे लागतात, त्यामुळे कधीही कोणतंही व्यसन करू नका.

जुगार – चाणक्य म्हणतात जुगाराचा नाद हा अत्यंत घातक आणि वाईट आहे. जो माणूस जुगाराच्या नादी लागतो, तो उद्ध्वस्त होतो. त्याचं आयुष्य म्हणजे संकटाने भरलेली एक मालिका असते. एक दिवस असा येतो की, या माणसाच्या आयुष्यात काहीच शिल्लक राहत नाही. सर्व घरदार उद्ध्वस्त होतं. त्यामुळे माणसाने नेहमी जुगारीपासून दूर रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

परस्त्री – चाणक्य म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये परस्त्री ही मातेसमान असते. त्यामुळे जे विवाहित पुरुष आहेत, त्यांनी परस्त्रीपासून दूर रहावं. आपल्या पत्नीसोबत आयुष्यभर प्रामाणिक राहावं, त्यातच तुमचं भलं आहे. तसेच पत्नीने देखील आपल्या पतीसोबत एकनिष्ठ असावं असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला