AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ही लोकं सापापेक्षाही खतरनाक, यांच्या पासून दोन हात लांबच राहा

णक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या लोकांपासून सावध राहायला हवे याबद्द्ल सांगितले आहे.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ही लोकं सापापेक्षाही खतरनाक, यांच्या पासून दोन हात लांबच राहा
chankaya niti
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya)  हे त्यांच्या ज्ञान आणि चपळ बुद्धीसाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या लोकांपासून सावध राहायला हवे याबद्द्ल सांगितले आहे. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही परिस्थितींपुढे हार मानली नाही. त्यांचे हे अनुभव लोकांच्या कामी यावेत असे त्यांना वाटत असावे म्हणूनच त्यांनी आपण आयुष्यात कोणत्या व्यक्तींपासून लांब राहावे हे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकांमध्ये सर्वांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी आणि आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही कोणाशी मैत्री करू नये. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांनी कोणत्या व्यक्तीची तुलना सापाशी केली आहे ते जाणून घेऊया

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला श्लोक

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः । सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे ।।

म्हणजेच सोप्या शब्दात याचा अर्थ असा की दुष्ट आणि साप यात विशेष फरक आहे की साप तुम्हाला तेव्हाच चावतो तेव्हाच त्याचा जीव धोक्यात असतो. परंतु दुष्ट माणूस प्रत्येक मार्गावर तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही.

जीवनात अशा मित्र-मैत्रिणींना सोबत ठेवावे जे तुमच्या सुख-दु:खात नेहमी तुमच्यासोबत उभे राहू शकतात. जर तुम्ही चुकूनही एखाद्या दुष्ट माणसाशी मैत्री केली असेल तर तो नेहमीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान करत राहील हे निश्चित. म्हणूनच आपण नेहमी विचारपूर्वक कोणाशीही घनिष्ठ मैत्री वाढवली पाहिजे.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा – चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा – चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

Satyanarayan Katha | घरात श्री सत्यनारायण कथा आयोजित करताय, मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

18 January 2022 Panchang : मंगळवारचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Magh Maas 2022 | कधी सुरु होत आहे ‘माघ’ महिना, कधी आहे मौनी अमावस्या जाणून घ्या इंत्यभूत माहिती

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.