AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ दोन गोष्टी म्हणजे यशाची चावीच; आर्य चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ कुटनीतीतज्ज्ञ आणि राजनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे.

Chanakya Niti : 'या' दोन गोष्टी म्हणजे यशाची चावीच; आर्य चाणक्य काय सांगतात?
| Updated on: Apr 17, 2025 | 9:27 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ कुटनीतीतज्ज्ञ आणि राजनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली. ज्यामध्ये आदर्श जीवन कसं असावं, व्यक्तीनं आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत? आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षण काय आहेत? आपला मित्र कोण, आपला शत्रू कसा ओळखावा? अशा एक ना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी जर व्यक्तीकडे असतील तर चाणक्य म्हणतात जगातील कोणतीच ताकद तुम्हाला यश मिळवण्यापासून थांबवू शकणार नाही, यश हे तुमचंच असणार आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं त्याबद्दल.

आर्य चाणक्य म्हणतात मेहनत ही एक अशी गोष्ट आहे. जगात मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही जर ठरवलं मला आयुष्यात ही गोष्ट मिळवायची आहे, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागले. जगात तुम्हाला फुकट मेहनत न करता कोणतीच गोष्ट मिळत नाही. त्यामुळे आयुष्यात कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुम्ही जी मेहनत करत आहात, तीची दिशा योग्य पाहिजे, तसेच तिला प्रामाणिकपणाची साथ असावी, तर यश तुम्हाला हमखास मिळेलच असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलताना सांगतात की तुम्ही जरी कठोर परिश्रम करत असाल मात्र तुमच्याकडे नम्रता नसेल तर तुमच्या मेहनतीला फळ मिळणार नाही. त्यामुळे आयुष्यात नम्र राहायला शिका. कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका, तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मेहनत करा, यश तुम्हाला मिळणारच असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.