AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या जगात स्वत:ला सिद्ध करायचं आहे? मग दररोज करा हे पाच कामं

चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात जगात स्वत:ला सिद्ध करणं आपली एक नवीन ओळख बनवणं हे वाटतं तितकं सोपं काम नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : या जगात स्वत:ला सिद्ध करायचं आहे? मग दररोज करा हे पाच कामं
CHANKYA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 8:47 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. मानवाने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही त्यांचे हे विचार अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य म्हणतात या जगात सर्वात जास्त अवघड कोणं काम असेल तर ते म्हणजे समाजात स्वत:ला सिद्ध करणं. समाजाला तुमची दखल घेण्यास भाग पाडणं. पुढे चाणक्य असंही म्हणतात की या जगात तुमच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात. तुमच्या कुटुंबात आई-वडील, तुमची पत्नी, तुमची मुलं असतात. त्या प्रत्येकाची तुमच्याबद्दलची असलेली अपेक्षा ही वेगळी असते. त्या सर्व अपेक्षा एकाचवेळी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. समाजाच्या अपेक्षाचं वझेही तुमच्यावर असते. अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागते. तर आणि तरच तुम्हाला या जगात मान-सन्मान मिळतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेच्या असतात.

दररोज सकाळी लवकर उठा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात मिळवायची आहे, असा निश्चय करतात, तेव्हा झोप विसरून जा. दररोज सकाळीच उठा, जे उशिरापर्यंत झोपून राहतात असे लोक कधीही आपलं ध्येय साध्य करू शकत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दिवसभरात काय करायचं आहे ते ठरवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा झोपेतून उठतात तेव्हा सर्वात आधी आज दिवसभरात तुम्हाला कोण कोणती कामं करायची आहेत ते निश्चित करा.

वेळेला महत्त्व – चाणक्य म्हणतात वेळ ही सर्वात मौल्यवान असते, त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.

जास्त ऐका कमी बोला – चाणक्य म्हणतात तुम्ही जास्तीत जास्त ऐका आणि कमी बोला हाच तुमच्या यशाचा मंत्र आहे.

आदर – चाणक्य म्हणतात आपल्या पेक्षा जे लोक वयानं आणि अनुभवानं मोठी आहेत, त्यांचा आदर करा

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र