AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर का असू नये? शेकडो वर्षांपूर्वीच चाणक्य यांनी सांगितलंय

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंबाबत आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे, चाणक्य पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करताना म्हणतात की, कधीही पती आणि पत्नीच्या वयामध्ये फार अंतर नसावं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर का असू नये? शेकडो वर्षांपूर्वीच चाणक्य यांनी सांगितलंय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 4:25 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी कौटुंबीक नातेसंबंधांबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जस की वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? आदर्श मुलगा कोणाला म्हणावं? आदर्श पती-पत्नीची लक्षणं काय आहेत? आई -वडिलांनी आपल्या मुलांवर कशापद्धतीने संस्कार करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य म्हणतात पती-पत्नीच्या वयात जास्त अतर नसावं, त्याची अनेक कारणं चाणक्य यांनी सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी ही संसाराची दोन चाक असतात, ती दोन्ही समान गतीनं धावली पाहिजेत तर संसाराचा रथ हा व्यवस्थित वेग घेत राहतो. प्रगती होत राहते. मात्र जर पतीचं वय हे पत्नीपेक्षा खूप जास्त असेल तर असा संसार फार काळ टिकेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कारण त्या दोघांच्या विचारांमध्ये मोठा फरक असतो. वयानं मोठा असलेला पती याचे विचार हे वेगळे असतात, तर वयानं लहान असलेल्या पत्नीचे विचार हे वेगळे असतात, त्यांच्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे असे नाते फार काळ टिकत नाही, त्यामुळे कधीही वृद्ध व्यक्तीने तरुणी मुलीशी लग्न करू नये.

चाणक्य आणखी एक महत्त्वाचं कारण हे देखील सांगतात, की संसार म्हटलं की जबाबदारी ही आलीच, जर एखाद्या वयानं खूप मोठ्या असलेल्या व्यकीने एखाद्या वयानं लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं तर तो आयुष्यभर तीची जबाबदारी घेऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संसार हा कोलमडून पडतो, तसेच जर पती-पत्नीच्या वयात जास्त अतंर असेल तर असं जोडपं समाजात देखील निंदेचा विषय बनतं असं चाणक्य सांगतात.

चाणक्य म्हणतात लग्न करताना पती हा पत्नीपेक्षा फार तर फार दोन ते तीन वर्षांनी मोठा असावा, कारण ते समवयस्कर असल्यामुळे असे नातेसंबंध दीर्घकाळ टिकतात. तसेच पती हा पत्नीपेक्षा थोडा मोठा असल्यानं त्याला सर्व जबाबदाऱ्यांची जाणीव देखील असते, त्यामुळे संसार सुरळीत चालतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.