AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच का लागतं? तुम्हाला माहिती आहे का यामागचं कारण?

हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांसाठी कुतूहलाचा असू शकतो तो म्हणजे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीलाच का होते? त्यामागचं कारणही आपण जाणून घेऊया. मात्र हा प्रश्नदेखील तुम्हाला कधी ना कधी पडलाच असेल तो म्हणजे पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्यात येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला ग्रहण का लागत नाही? या कुतूहलावरून आज आपण पडदा उघडूया.

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच का लागतं? तुम्हाला माहिती आहे का यामागचं कारण?
चंद्र ग्रहण Image Credit source: Getty Image
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 28, 2023 | 9:12 AM
Share

मुंबई : आज चंद्रग्रहण आहे. काही कारणांमुळे उद्याचं ग्रहण हे विशेष ठरणार आहे. ग्रहण म्हंटलं की दोन प्रकारच्या चर्चा या कायम होतात. त्या म्हणजे शास्त्रीय आणि आध्यात्मिक. दोनीही बाबतीत ग्रहण हे विशेष आणि महत्त्वाचं मानल्या जातं. असं असलं तरी एक गोष्ट तुमच्या कधी लक्षात आली आहे का? की चंद्रग्रहण (Lunar Eclipse) हे नेहमी पौर्णिमेलाच लागतं. अमावस्येला ग्रहण लागल्याचं तुम्ही कधी एकलं नसेल. पण हे असं का होतं? ग्रहणाचा आणि पौर्णिमेचा नेमका संबंध तरी काय आहे? हा योगायोग कसा जुळून येतो? हे कुतूहल तुम्हालासुद्धा आहे का? जर असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक मिलींद गोडबोले यांच्याकडून आज आपण ग्रहणाबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

चंद्रग्रहण कसं लागतं?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात शिकलो आहे. या प्रक्रियेत एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो पण चंद्रापर्यंत पोहोचत नाही. या घटनेला खगोलीय घटना म्हणून चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर फक्त पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली आहे.

चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला का होते?

हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांसाठी कुतूहलाचा असू शकतो तो म्हणजे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीलाच का होते? त्यामागचं कारणही आपण जाणून घेऊया. पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्यात येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला ग्रहण होणे शक्य नाही. खरे तर चंद्र पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 5 अंशाने झुकलेला राहतो. या कलतेमुळे चंद्र प्रत्येक वेळी पृथ्वीच्या सावलीतून जात नाही. यामुळे बहुतेक वेळा चंद्र पृथ्वीच्या वर किंवा खाली जातो. या कारणास्तव, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत नाही, परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जातो तेव्हा त्या दिवशी पौर्णिमा येते आणि सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. या कारणास्तव, चंद्रग्रहण केवळ पौर्णिमेच्या दिवशीच शक्य आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग असतो त्यामुळे चंद्र ग्रहणाला शास्त्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

सुर्यग्रहण हे अमावस्या तिथीलाच का लागतं?

चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच का लागतं याबद्दल तर आपण जाणून घेतलं पण विषय निघालाचं आहे तर हेही जाणून घेऊया की सूर्यग्रहण फक्त अमावस्या तिथीलाच का लागतं? यामागचं कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्याला 27 दिवस लागतात. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा या घटनेला सुर्यग्रहण म्हणतात. अमावस्या तिथीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, म्हणून सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीलाच होते.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत