AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. […]

Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य
| Updated on: Jul 10, 2022 | 11:48 AM
Share

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. यावेळी चातुर्मास 10 जुलै ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. जाणून घ्या या काळात कोणती कामे शुभ मानली जातात.

चातुर्मासाविषयी अशी श्रद्धा आहे की, या काळात आपल्या देवतांचे अधिकाधिक मंत्र जपले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-शांती येण्याची शक्यता असते. या काळात शक्य तितके धार्मिक ग्रंथ वाचावे व धार्मिक कार्य करावे.

या काळात आपण जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा. चप्पल, छत्री, कपडे इत्यादी अन्नपदार्थांसह गरजूंना दान करा.

असे मानले जाते की, जो व्यक्ती चातुर्मासात गायींची काळजी घेतो आणि अन्नपदार्थ दान करतो. त्याच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा सदैव राहते. या 4 महिन्यांत अन्न आणि गाईचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्याही दूर होते.

या चार महिन्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते.

चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मंदिरात कापूर दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.