AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे काढा रांगोळी

दिवाळीच्या सणाला रांगोळी काढण्याचे विशेष महत्त्व आहे. या सणाला वास्तुशास्त्रानुसार रांगोळी काढल्यास विशेष लाभ मिळेल.

Diwali 2022: दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे काढा रांगोळी
रांगोळी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 20, 2022 | 11:56 PM
Share

मुंबई,  दिवाळीच्या सणात दिव्यांप्रमाणेच रांगोळीलादेखील महत्त्व आहे. यामागे विविध धार्मिक श्रद्धा आहेत. एका मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून अयोध्या नगरी परतले तेव्हा त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आनंदात लोकांनी संपूर्ण अयोध्या सजवली आणि दिवे लावले. यासोबतच दारासमोर रांगोळी देखील काढल्या  तेव्हापासून आजतागायत दिवाळीच्या दिवशी रांगोळी, दिवे आदींनी घर सजवण्याची परंपरा सुरू आहे. दिवाळीच्या दिवशी काढलेली रांगोळी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घराच्या बाहेर आणि आत काढलेली रांगोळी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी काढली जाते. यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते. दीपावलीच्या दिवशी घराच्या कोणत्या कोपऱ्यात शुभ आणि सौभाग्य वाढवणारी रांगोळी कशी काढावी आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया.

  1. रांगोळी हा शब्द ‘रंग’ आणि ‘अवल्ली’ या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे – रंगांची रांग. दीप -उत्सवात ही प्राचीन कला बनवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
  2. घराच्या आत आणि बाहेर अनेक प्रकारची रांगोळी काढली जाते, परंतु दीपावलीच्या दिवशी कमळाची रचना केलेली रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीला कमळाची रांगोळी काढल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कमळाला लक्ष्मीचे आसन मानले जाते.
  3. वास्तूनुसार दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढावी. या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी विशेषतः लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी या रंगांचा वापर करावा. असे मानले जाते की या रंगांचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूनुसार रांगोळीसाठी काळा रंग वापरू नये.
  4. रांगोळी काढताना तुमचे बोट आणि अंगठा मिळून ज्ञानमुद्रा (प्राणायाम मुद्रा) बनवतात. असे मानले जाते की बोटांच्या या आसनांमुळे तुमचा मेंदू अधिक उत्साही आणि सक्रिय होतो, तसेच तुमची बौद्धिक शक्ती वाढते.
  5. रांगोळी काढताना मैदा, तांदूळ, हळद, कुमकुम, फुले, पाने यांचा वापर करणेही खूप शुभ मानले जाते. तुम्हाला हवं असेल तर दिवाळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगवून रांगोळी बनवण्यासाठी तुम्ही तांदूळही वापरू शकता.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.