AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वामनरुपी सरकारला जमिनीत गाडू , इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, म्हणत नांदेडचे शेतकरी आक्रमक

भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळीराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते. पण यावर्षी नांदेड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या सरकाररुपी प्रतिकात्मक वामनाला गाडत कौंढा गावात दिवाळी साजरी केली.

वामनरुपी सरकारला जमिनीत गाडू , इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, म्हणत नांदेडचे शेतकरी आक्रमक
farmers
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 10:34 AM
Share

मुंबई : भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळीराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते. पण यावर्षी नांदेड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या सरकाररुपी प्रतिकात्मक वामनाला गाडत कौंढा गावात दिवाळी साजरी केली. राज्यामध्ये शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या प्रकारची दिवाळी साजरी करण्यात आली. अर्धापुर तालुक्यातील शेतकरी संघटनेचा गड असलेल्या कौंढा गावात हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय, मात्र केंद्र आणि राज्य अश्या दोन्ही सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे ‘सरकार ही समस्या है’ असे नारे देत शेतकरी संघटनेने वाजत गाजत वामनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत वामनाला गाडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

काय आहे शेतकऱ्यांचे मत?

बळीराजाला गाडायचं काम वामनाने केलं, तेव्हापासून कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांचेच हाल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांतर्फे वामनाला गाडण्याचा कार्यक्रम दर वर्षी केला जातो. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्याचे मरण. खुली अर्थव्यवस्था आम्हाला मान्य आहे. आमचे हात खूले करा, आम्हाला स्वतंत्र द्या, आमच्या मालाचा हमी भाव ठरवण्याचा अधिकार द्या. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळत नसतील तर या वामनरुपी सरकारला आम्ही असचं जमिनीत गाडू. असे हल्लाबोल शेतकऱ्यांनी यावेळी सरकारवर केला.

बलिप्रतिपदेची आख्यायिका

बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की, पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

इतर बातम्या :

PHOTO | Chanakya Niti : जीवनाशी संबंधित आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या याबाबत

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

नवग्रहांशी जोडलंय तुमचं नशीब, पाहा कोणत्या ग्रहावर असते देवी लक्ष्मी प्रसन्न

Follow Us
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......