AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lord Sun Remedies | सूर्य देवाची कृपा हवी असेल तर, अर्घ्य वाहताना या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा

ज्योतिषशास्त्रात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मकुंडलीच्या 12 राशींमध्ये राहणार्‍या नऊ ग्रहांपैकी सूर्य कोणत्याही व्यक्तीचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळखीचे प्रतीक मानले जाते. कुंडलीत सूर्य शुभ असतो तेव्हा व्यक्ती वैभवशाली जीवन जगते.

Lord Sun Remedies | सूर्य देवाची कृपा हवी असेल तर, अर्घ्य वाहताना या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा
surya-namaskar
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 7:30 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मकुंडलीच्या 12 राशींमध्ये राहणार्‍या नऊ ग्रहांपैकी सूर्य कोणत्याही व्यक्तीचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळखीचे प्रतीक मानले जाते. कुंडलीत सूर्य शुभ असतो तेव्हा व्यक्ती वैभवशाली जीवन जगते. नोकरीचा विषय असो किंवा सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास, त्यात सूर्याची भूमिका महत्त्वाची असते. कोणत्याही व्यक्तीचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यात सूर्यदेवाचा महत्त्वाचा वाटा असतो. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यापासून त्याचे सुख, कीर्ती, तेज, पराक्रम, आत्मा, पिता, नोकरी, डोके रोग, नेत्ररोग, शत्रुत्व, आरोग्य इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. चला तर मग सूर्यदेवाला प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या उपासना कराव्यात हे जाणून घेऊया.

सूर्यदेवाची पूजा करण्याचा उपाय

सूर्यदेवाची शुभ प्राप्ती करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे. यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा, जे भगवान सूर्यदेवांचा आशीर्वाद देतात. आदित्य हृदय स्तोत्राचे तीनदा पठण करा.

सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत

सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भांड्यात पाण्यासोबत लाल फुले, कुंकू आणि तांदूळ घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पाहा.पाणी देताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा. यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण कराल, त्या ठिकाणी जाऊन सूर्यदेवाची प्रदक्षिणा पूर्ण करा.

पूजेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा

उगवत्या सूर्यदेवाला नेहमी जल अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि काही कारणास्तव ते शक्य नसेल तर त्या दिवशी पाण्यात अक्षत टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्याला दिले जाणारे पाणी तुमच्या पायावर पडणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. सूर्यदेवाला नेहमी शुद्ध आणि पवित्र जल अर्पण करा. शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

संबंधित बातम्या :

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा…

नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेल

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.