AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा…

हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी वेळेशी जोडून पाहिली जातात. उदाहरणार्थ, काही काम सूर्योदयानंतर आणि काही काम सूर्यास्तापूर्वी करण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणा आहोत की सूर्यास्तानंतर कोणते काम करु नये (Things To Avoid After Sunset)

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा...
Sunset
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई : अशी अनेक कामे आहेत, ज्याची वेळ ठरलेली आहे. आजी-आजोबांच्या काळापासून ती कामे विशिष्ट वेळी करण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी वेळेशी जोडून पाहिली जातात. उदाहरणार्थ, काही काम सूर्योदयानंतर आणि काही काम सूर्यास्तापूर्वी करण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणा आहोत की सूर्यास्तानंतर कोणते काम करु नये (Things To Avoid After Sunset) –

मान्यतेनुसार, असे केल्यास घरामध्ये रोग, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा नाराज होते.

1. नखे आणि केस कापणे

सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नये. एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते असेही मानले जाते.

2. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे

असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करु नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये, असा समज आहे. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर झाडे देखील झोपतात.

3. कपडे धुणे आणि वाळवणे

सूर्यास्तानंतर कपडे धुण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो.

4. अन्न उघडे ठेवणे

सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे, जर त्यावर झाकले नाही तर नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे तुम्ही ते खाल्ल्यास आजारी पडू शकता.

5. अंत्यसंस्कार करणे

सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करु नयेत असे पुराणात सांगितले आहे. असे केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येऊ शकतो.

6. दही किंवा भात खाणे

सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करणे पुराणात निषिद्ध मानले गेले आहे. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर भातही खाल्ला जात नाही.

7. दही दान करणे

दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो. अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी दूर होते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.