AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर्श अमावस्येला करा हे पाच उपाय, पितरांना मिळेल शांती

दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा, दान आणि उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने पितरांची शांती होते.

दर्श अमावस्येला करा हे पाच उपाय, पितरांना मिळेल शांती
दर्श अमावस्या
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 12:56 PM
Share

हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे. दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख, शांती कायम राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष दूर होतात. तसेच या दिवशी केलेल्या पूजेने पुण्य प्राप्त होते.

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या 30 नोव्हेंबरला सकाळी 10: 29 मिनिटांनी सुरू होईल आणि एक डिसेंबरला सकाळी 11:50 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार दर्श अमावस्या 30 नोव्हेंबर रोजी असणार आहे.

दर्श अमावस्येला करा हे उपाय

पितृ दोष दूर करण्यासाठी

पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करा आणि आणि दिवा लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्रांची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा. या दिवशी मंत्र जप केल्याने पितरांची शांती होते.

दान

काळया तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते. यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गाईंना चारा दिल्याने पितर प्रसन्न होतात.

श्राद्ध विधी

पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो.

पूर्वजांचे स्मरण करा

दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा. दान करताना आपल्या पूर्वजांची नावे घ्या.

मंदिरात पूजा करा

दर्श अमावस्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल.

दर्श अमावस्येचे महत्त्व

दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्मांना शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.