AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana : या 5 लोकांच्या घरी अन्न खाल्ल्याने व्यक्ती बनते पापाची भागीदार

. गरुड पुराणाचा खरा हेतू लोकांना योग्य मार्ग दाखवणे आहे. गरुड पुराणानुसार, काही लोकांच्या ठिकाणी अन्न खाणे धार्मिक मानले जात नाही, ज्यामुळे अन्न खाणारी व्यक्ती देखील पापाची भागीदार बनते.

Garuda Purana : या 5 लोकांच्या घरी अन्न खाल्ल्याने व्यक्ती बनते पापाची भागीदार
ब्रह्मचाऱ्याने आई-वडील आणि शिक्षकांशिवाय इतर कोणालाही खांदा देऊ नये. यामुळे त्याचे ब्रह्मचर्य मोडते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, कोणत्याही मृत शरीराला प्रथम गंगाजलाने स्नान करावे आणि चंदन, तूप आणि तिळाच्या तेलाने लेपित करावे.
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 06, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : गरुड पुराणाबद्दल लोकांचा सामान्य विश्वास असा आहे की, ते मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगते. पण हे पूर्ण सत्य नाही. गरुड पुराण हे असेच एक महान पुराण आहे जे एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतची परिस्थिती आणि मृत्यूनंतरच्या संपूर्ण घटनेचे वर्णन करते. गरुड पुराणातील आचारशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते आणि त्याचे जीवन अधिक चांगले होऊ शकते. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त करतो. गरुड पुराणाचा खरा हेतू लोकांना योग्य मार्ग दाखवणे आहे. गरुड पुराणानुसार, काही लोकांच्या ठिकाणी अन्न खाणे धार्मिक मानले जात नाही, ज्यामुळे अन्न खाणारी व्यक्ती देखील पापाची भागीदार बनते. जाणून घ्या कोणत्या लोकांनी येथे खाऊ नये. (Eating at the home of these 5 people makes a person a partner in sin)

हडप करणारा

जे इतरांच्या असहायतेचा फायदा घेऊन पैसे कमवतात, म्हणजेच गरजूंना पैसे देऊन आणि त्यांच्याकडून व्याज घेऊन, अशा लोकांच्या घरात पाणी पिणे देखील पाप मानले जाते. अशा लोकांचा पैसा ना त्यांचे भले करतो ना इतरांचे.

अमली पदार्थांचा विक्रेता

गरुड पुराणानुसार, अमली पदार्थांचा व्यवसाय करणारी व्यक्ती अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करते, तसेच त्यांच्या कुटुंबाला संकटात टाकते. अशा लोकांच्या घरात पाऊल टाकणे देखील पाप मानले जाते. त्यांच्या घरचे अन्न तुम्हाला पापात भागीदार बनवते.

आजारी व्यक्ती

जी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजाराने ग्रस्त आहे त्याच्या घरात बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे अशा घरात अन्न न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घरातही रोग पसरण्याची शक्यता आहे.

गुन्हेगार व्यक्ती

जी व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे, ज्याचा अपराध न्यायालयात सिद्ध झाला आहे, असे लोक विश्वासार्ह नाहीत. त्यांच्या घरचे पाणीही पिऊ नये. असे करणारी व्यक्ती पापाची भागीदार बनते.

संतप्त व्यक्ती

अन्नाबाबत असे म्हटले जाते की, अन्नाप्रमाणेच मनही असते. अशा स्थितीत जर तुम्ही एखाद्या रागावलेल्या व्यक्तीच्या घरी अन्न खाल्ले तर तुमच्यामध्येही रागाची भावना निर्माण होईल. त्यामुळे रागावलेल्या व्यक्तीचे अन्न कधीही खाऊ नये. (Eating at the home of these 5 people makes a person a partner in sin)

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सामान्य जनहित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)

इतर बातम्या

IRCTC चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला, पैसे कमावण्याची संधी

Dussehra 2021 : दसरा कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Follow Us
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?