AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी ‘हे’ खास उपाय केल्यास आयुष्यातील संकट होतील दूर….

Pradosh Vrat Puja Niyam: हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते. महिन्यात दोन प्रदोष व्रते असतात. प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या दिवशी उपवास आणि पूजेसोबत काही उपाय देखील केले जातात.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी 'हे' खास उपाय केल्यास आयुष्यातील संकट होतील दूर....
प्रदोष व्रतImage Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 5:08 PM
Share

देवांचे देव महादेव यांची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये असे अनेक सण साजरा केले जातात ज्यामध्ये उपवास देखील केले जाते. सनातर धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्तव दिले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. दर महिन्याला प्रदोष व्रत केले जाते. तुमच्या आयुष्यामधील संकट दूर करण्यासाठी आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रदोष व्रताचा उपवास फायदेशीर मानला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि विधिनुसार, व्रत केल्यामळे महादेवाचे आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतात.

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा नेहमी प्रदोष काळामध्ये केली जाते. या दिवशी तुमच्या मनातील विचार सकारात्मक ठेवा. प्रदोष व्रताच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, जो कोणी प्रदोष व्रताच्या दिवशी योग्य विधींसह महादेवाचे उपवास आणि पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि वेदना दूर होतात आणि चिंता संपतात. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजेसोबत काही उपाय देखील केले जातात. या दिवशी शास्त्रांमध्ये महिलांसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत. जर महिलांनी हे उपाय अवलंबले तर त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या येणार नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी उद्या म्हणजेच 11 मार्च रोजी सकाळी 8:13 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 12 मार्च रोजी सकाळी 9:11 वाजता संपेल. अशा परिस्थितीत उद्या प्रदोष उपवास पाळला जाईल. उद्या पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 6:47 ते रात्री 9:11 पर्यंत असेल. उद्या मंगळवार आहे, म्हणून त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हणतात.

प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी हे उपाय करावे…..

प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी प्रदोष काळात किंवा दिवसभरात कधीही सात दाणे पिवळे तांदूळ घ्यावेत. नंतर, तुमचे नाव आणि गोत्र सांगितल्यानंतर, ते शिवलिंगाला समर्पित करा. हा उपाय पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडावरही करता येतो, परंतु शिवलिंगावर किंवा या झाडांवर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी पाणी अर्पण करावे हे लक्षात ठेवा. तसेच अगरबत्ती पेटवा. या दिवशी महिलांनी माती किंवा पिठाचा दिवा बनवावा आणि त्यात शिव-शक्तीच्या नावाने दोन वाती ठेवाव्यात. नंतर दिवा लावल्यानंतर, तो तळहातावर घ्यावा आणि भगवान शिवाच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा. प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या दान कराव्यात. पार्वती मातेला सिंदूर, बिंदी आणि मेहंदी लावावी.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप