AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : ट्रेंडमध्ये आहेत सुखलेली फुलं, जाणून घ्या घरात ठेवणं शुभ की अशुभ?

सध्या सुखलेली फुलं ही चांगलीच ट्रेंडमध्ये आहेत, अनेकजण आपल्या घराच्या सजावटीसाठी या सुखलेल्या फुलांचा वापर करत आहेत. तर काही जण गिफ्ट म्हणून देखील ही फुलं देत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत? सुखलेली फुलं घरात ठेवणं शुभ असतं की अशुभ? फेंग शुई शास्त्र काय सांगतं?

Feng Shui : ट्रेंडमध्ये आहेत सुखलेली फुलं, जाणून घ्या घरात ठेवणं शुभ की अशुभ?
Dried flowersImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 7:23 PM
Share

सध्याच्या काळात मार्केटमध्ये सुकलेल्या फुलांना मोठी मागणी आहे. लोक या फुलांचा वापर आपल्या घराच्या सजावटीसाठी करत आहेत. एवढंच नाही तर काही जण तर या फुलांना एखाद्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देखील देत आहेत. मात्र अशा प्रकारचे फुलं घरात ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेगं शुईमध्ये सुखलेल्या फुलांना यिन ऊर्जा अर्थात सकारात्मक ऊर्जा रोखणाऱ्या ऊर्जेच्या स्वरुपात पाहिलं जातं. त्यामुळे अशा फुलांचा वापर हा खूप विचारपूर्वक करावा असा सल्ला फेंग शुई शास्त्रात देण्यात आला आहे. जर तुम्ही कुठेही या फुलांचा वापर केला तर फायद्यापेक्षा तुमचं नुकसानच अधिक होऊ शकतं, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. फेंग शुईनुसार सुखलेल्या फुलांची सजावट कधीही आपल्या बेडरूममध्ये करू नये. यामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. घरात काहीही कराण नसताना सारखी भांडणं होतात, त्यामुळे अशी फुलं बेडरूममध्ये ठेवू नये.

जर समजा तुम्ही तुमच्या घरात इतर ठिकाणी सजावटीसाठी सुखलेल्या फुलांचा वापर करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. या फुलांवर कधीही धूळ जमा होऊ देऊ नका, तसेच जर या फुलांमध्ये एखादं तुटलेलं फुल असेल किंवा खराब झालेली फुलं असतील तर ती लगेच काढून टाका, त्यांना घरात ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्याचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. यामुळे भविष्यात तुम्हाला काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीची फुलं घरात ठेवू नये, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

फेंग शुईनुसार सुखलेल्या फुलांपेक्षा सजावटीसाठी ताजी फुलं हे अधिक चांगली असतात. ताजी फुलं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून आणतात, तर सुखलेली फुलं ही सकारात्मक ऊर्जेच्या मार्गातील अडथळा बनतात. सुखलेल्या फुलांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. त्यामुळे घरात कधीही सुखलेल्या फुलांऐवजी ताजी फुलं ठेवावीत असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. तसेच घराच्या सजावटीसाठी किंवा तोरणासाठी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करू नये, त्यासाठी खरी आणि ताजी फुलं वापरावीत असंही फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर