.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2025 date, timing in India: भारतात कधी दिसेल सूर्यग्रहण आज की उद्या? सुतक कालावधी जाणून घ्या

Surya Grahan 2025 date, timing in India: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दिसणार आहे. यावेळी सूर्यग्रहणाचा दिवसही चैत्र अमावस्येला येणार आहे. वर्षाचा पहिला सूर्यग्रहण शनिवार, 29 मार्च रोजी दुपारी 2:21 वाजता सुरू होईल आणि 6:14 वाजता संपेल.

Surya Grahan 2025 date, timing in India: भारतात कधी दिसेल सूर्यग्रहण आज की उद्या? सुतक कालावधी जाणून घ्या
| Updated on: Mar 29, 2025 | 7:49 AM
Share

Surya Grahan 2025 date, time in India: सूर्यमालेतील ग्रहण ही खगोलीय घटना असू शकते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा परिणाम फायदेशीर किंवा हानिकारक असू शकतो. ज्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवारी म्हणजेच 29 मार्च रोजी होणार आहे, ग्रहण भारतात दिसणार नाही. याशिवाय उद्या शनि अमावस्येचाही योगायोग आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच 29 मार्च रोजी होईल. हे सूर्यग्रहण आंशिक असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, आंशिक उत्तर अमेरिका, उत्तर आशिया, उत्तर-पश्चिम आफ्रिका, युरोप, उत्तर ध्रुव, आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी म्हणजेच 29 मार्च रोजी होणारे सूर्यग्रहण दुपारी 2:21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:14 वाजता संपेल. ग्रहणाचा कालावधी 3 तास 53 मिनिटं असणार आहे.

किती प्रभावी असेल सुतक काळ?

सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ भारतात प्रभावी नसेल. याचा सरळ अर्थ असा आहे की या ग्रहणाचा भारतावर किंवा जगावर कोणताही भौतिक, आध्यात्मिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक परिणाम होणार नाही. या काळात भारतातील लोकांची दिनचर्या पूर्वीप्रमाणेच सामान्य राहील. धर्मग्रंथानुसार ग्रहणाचा प्रभाव फक्त त्या भागातच जाणवतो ज्या ठिकाणी तो दिसतो. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा भारतीयांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सूर्यग्रहणादरम्यान काय कराल?

सूर्यग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करावे. संपूर्ण घर आणि देवी-देवतांची शुद्धी करा.

ग्रहण सुरु असताना थेट सूर्याकडे पाहणं टाळावं.

ग्रहण काळात गरजेनुसार घराबाहेर पडावं, शिवाय कोणतंही वाईट काम करु नये.

ग्रहण संपल्यानंतर हनुमानाची पूजा करावी.

सूर्यग्रहण काळात खाणेपिणे का निषिद्ध आहे?

सूर्यग्रहण काळात काहीही खाऊ नये, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. पुराणात असेही सांगितले आहे की सूर्यग्रहण काळात अन्न खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने सर्व पुण्य आणि कर्मे नष्ट होतात, असेही म्हटले जाते.

Follow Us
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड