AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganga Saptami : गंगा सप्तमीला केलेल्या या उपायांमुळे दूर होतो पितृदोष, मिळते अश्वमेध यज्ञाचे फळ

असे मानले जाते की वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलातून गंगेचा जन्म झाला आणि भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली होती.

Ganga Saptami : गंगा सप्तमीला केलेल्या या उपायांमुळे दूर होतो पितृदोष, मिळते अश्वमेध यज्ञाचे फळ
गंगा जयंतीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 25, 2023 | 7:39 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमीला गंगा सप्तमी (Ganga Saptami 2023) साजरी केली जाते. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला, भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडातून गंगा प्रकट झाली, म्हणून या दिवशी गंगा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गंगा सप्तमी 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल, तर यावर्षी सप्तमी 26 आणि 27 एप्रिल या दोन्ही दिवशी असेल, परंतू गंगा सप्तमी साजरी करण्याचा मुख्य दिवस 27 एप्रिल आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कार्य केल्याने आपल्याला विशेष फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करून पितरांना जल अर्पण करणे, दानधर्म करणे इत्यादी केल्याने अनेक पटींनी लाभ होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीला गंगेत स्नान करून पितरांना गंगाजल अर्पण करणे आणि त्यांच्यासाठी कोणतेही कार्य करणे हा अत्यंत शुभ  मानले जातो. भगीरथने आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी गंगा  पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली, त्यानंतर त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली.

शुभ मुहूर्त

गंगा सप्तमी 27 एप्रिल रोजी संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. गंगा सप्तमीच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या हितासाठी कोणतेही काम केल्यास विशेष फळ मिळते. गंगा सप्तमीचा शुभ मुहूर्त 26 एप्रिल रोजी सकाळी 11.27 पासून सुरू होईल आणि 27 एप्रिल रोजी दुपारी 1.38 पर्यंत राहील. या दरम्यान गंगेच्या घाटावर जाऊन पितरांचे कार्य केल्याने अनेक फायदे होतात. गंगा सप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि दान केल्याने गंगा माता त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

गंगा जयंती

गंगा सप्तमीला गंगा जयंती देखील म्हणतात. असे मानले जाते की वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलातून गंगेचा जन्म झाला आणि भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली होती. त्यानंतर, भगीरथने भगवान भोलेनाथांची पूजा करून प्रसन्न झाल्यावर आपले केस उघडले आणि गंगेचा प्रवाह पृथ्वीवर वाहू दिला, जेणेकरून मानवाचे कल्याण होईल. माता गंगा पृथ्वीवर येण्याचा मुख्य उद्देश भगीरथच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा होता, म्हणजेच गंगा सप्तमीच्या दिवशी पितरांसाठी कोणतेही कार्य केल्यास मनुष्याला अनेक पटींनी फळ मिळते.

अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते

जी व्यक्ती गंगा सप्तमीला गंगा मातेची पूजा करते आणि पिंडदान, तर्पण, दान इत्यादी कोणतेही कार्य करते, त्याला त्याचे हजारपट फळ मिळते. धार्मिक ग्रंथांनुसार जो गंगा सप्तमीला आपल्या पितरांसाठी कोणतेही कार्य करतो, त्याला अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. गंगा सप्तमीच्या दिवशी पितरांसाठी शुद्ध चित्ताने आणि नि:स्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचे फळ तर मिळतेच, शिवाय पितरांचा आशीर्वादही सदैव राहतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.