AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम

शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम
गायत्री मंत्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2023 | 10:14 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रानुसार (Astro Tips) घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केल्याने सकारात्मकता येते. शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जशी सकाळी पूजा करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या पूजेचेही खूप महत्त्व आहे. पण संध्याकाळच्या पूजेबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या पूजेचे काही महत्त्वाचे नियम.

संध्याकाळी पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवावा. यासोबतच दिवा लावावा. आरतीच्या वेळीही बेलचा वापर करावा.
  • शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत. नैवेद्यात तुळशीची पाने आवश्यक असल्यास ती अगोदरच तोडून ठेवावीत. नैवेद्य दाखवण्यापूर्वी दिवा लावावा.
  • शास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप संध्याकाळी केला जात नाही, त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी गायत्री मंत्राचा उच्चार न करण्याची विशेष काळजी घ्यावी.
  • गायत्री मंत्राचा जप नेहमी सूर्योदयाच्या दोन तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास करावा. अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम साध्य होत नाहीत.
  • ज्योतिषशास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप मौन राहूनही करता येतो. पण रात्री ते करणे टाळा. आंघोळीनंतर पिवळे कपडे परिधान करून गायत्री मंत्राचा जप केल्याने फायदा होतो.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेनंतर दिवा विझला तर तो पुन्हा लावू नये. दिवा विझल्यानंतर फुलांची माळ परमेश्वरासमोरून काढावी.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेमध्ये नेहमी दोन दिवे लावावेत. एक तूप आणि एक तेल. असे करणे शुभ मानले जाते. यावर देवाचा आशीर्वाद राहतो असे म्हणतात.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजा आणि आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद करावेत. त्यानंतर सकाळच्या पूजेच्या वेळीच मंदिराचे दरवाजे उघडावेत.
  • ज्योतिष शास्त्रानुसार वर सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यानेच उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड