AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम

शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम
गायत्री मंत्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2023 | 10:14 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रानुसार (Astro Tips) घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केल्याने सकारात्मकता येते. शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जशी सकाळी पूजा करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या पूजेचेही खूप महत्त्व आहे. पण संध्याकाळच्या पूजेबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या पूजेचे काही महत्त्वाचे नियम.

संध्याकाळी पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवावा. यासोबतच दिवा लावावा. आरतीच्या वेळीही बेलचा वापर करावा.
  • शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत. नैवेद्यात तुळशीची पाने आवश्यक असल्यास ती अगोदरच तोडून ठेवावीत. नैवेद्य दाखवण्यापूर्वी दिवा लावावा.
  • शास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप संध्याकाळी केला जात नाही, त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी गायत्री मंत्राचा उच्चार न करण्याची विशेष काळजी घ्यावी.
  • गायत्री मंत्राचा जप नेहमी सूर्योदयाच्या दोन तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास करावा. अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम साध्य होत नाहीत.
  • ज्योतिषशास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप मौन राहूनही करता येतो. पण रात्री ते करणे टाळा. आंघोळीनंतर पिवळे कपडे परिधान करून गायत्री मंत्राचा जप केल्याने फायदा होतो.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेनंतर दिवा विझला तर तो पुन्हा लावू नये. दिवा विझल्यानंतर फुलांची माळ परमेश्वरासमोरून काढावी.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेमध्ये नेहमी दोन दिवे लावावेत. एक तूप आणि एक तेल. असे करणे शुभ मानले जाते. यावर देवाचा आशीर्वाद राहतो असे म्हणतात.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजा आणि आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद करावेत. त्यानंतर सकाळच्या पूजेच्या वेळीच मंदिराचे दरवाजे उघडावेत.
  • ज्योतिष शास्त्रानुसार वर सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यानेच उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना