AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: ‘या’ ठिकाणी लाज बाळगली तर आयुष्यातून व्हाल बरबाद

प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनेक समस्यांमधून वाट काढत जावेच लागते. तेव्हाच माणूस हा यशस्वी होतो. त्यात माणसांनी अश्या काही ठिकाणी आजिबात लाजलं नाही पाहिजे. त्यात ज्याला ज्या ठिकाणी लाज वाटेल तेव्हा तो माणूस आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही. कारण लाज वाटू घेतल्याने माणसाची हिंमत पुढे सरसावत नाही. लाजेपोटी स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. त्यामुळे कामात अपयश निर्माण होतात.

Chanakya Niti:  'या' ठिकाणी लाज बाळगली तर आयुष्यातून व्हाल बरबाद
| Edited By: | Updated on: Dec 13, 2024 | 3:32 PM
Share

आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपल्या समाजात लाखोंच्यावर लोकं त्यांच्या यशाच्या शिखरावर आहे. कारण त्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान व्यक्तींपैकी एक मानले जायचे. राजासह राज्यातील एखादी व्यक्ती कुठल्याही संकटात सापडली किंवा कुठल्याही मताची गरज भासली की तो प्रथम आचार्य चाणक्य यांच्याकडे जाऊन सल्ला घेत असे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या हयातीत अनेक धोरणांची रचना केली होती, जी पुढे चाणक्य नीती म्हणून ओळखली जाऊ लागली.

मानवजातीच्या भल्यासाठी चाणक्य यांनी अनेक प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये ही काही ठिकाणे आणि परिस्थितींचा उल्लेख केला आहे जिथे माणसाला कधीही लाज वाटू नये. जर तुम्हाला या ठिकाणांची लाज वाटली तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. चला जाणून घेऊया अशा परिस्थितीबद्दल जिथे एखाद्या व्यक्तीला कधीही लाज वाटू नये.

जेवताना लाज बाळगू नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जेवताना माणसाने कधीही लाज बाळगू नये. जेवताना ज्याला लाज वाटते त्याचे पोट कधीच भरत नाही आणि तो उपाशी राहतो. चाणक्य नीतीनुसार अर्धवट पोट भरलेले आणि उपाशी राहिल्याने व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. कधी कधी भुकेमुळे माणसं चुकीचे निर्णयही घेऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या निर्णयामुळे त्यांना आयुष्यात प्रगती करता येत नाही.

पैशाच्या व्यवहारात लाज बाळगू नये

चाणक्य नीतीनुसार माणसाने पैशाच्या व्यवहाराची कधीही लाज बाळगू नये. जर तुम्ही कुणाला कर्ज किंवा उधारी दिले असेल तर तुम्ही कोणताही संकोच न बाळगता त्यांच्याकडे पैसे मागितले पाहिजेत. तुम्हाला स्वतःचे आणि कष्टाचे पैसे मागायला कधीही लाज वाटली नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमचे पैसे मागायला लाज वाटत असेल तर तुम्हाला नेहमी पैशांशी संबंधित समस्येतून जावे लागेल.

आपले शब्द पाळण्यास लाज बाळगू नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने आपल्या गोष्टी इतरांसमोर ठेवण्यास कधीही संकोच करू नये. एखादी गोष्ट योग्य वाटत असेल तर ती बरोबर सांगा आणि चुकीची वाटत असेल तर ती चुकीची म्हणा. जो माणूस आपल्या मनातील बोलण्यास कचरतो, तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही.

शिक्षण घ्यायला लाज बाळगू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाने नेहमी नवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे. तुम्ही कोणाकडूनही शिक्षण घेऊ शकता. शिक्षण देणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठी असेलच असे नाही. तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीसुद्धा तुम्हाला नवीन गोष्टी शिकवू शकते. अनेकदा लहान मुलांकडून गोष्टी शिकायला आपल्याला लाज वाटते आणि आपण संकोच करू लागतो. जर तुम्हीही शिक्षण घेण्यास लाजत असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास खूप त्रास होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान