AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajri Teej 2022: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला करतात कजरी तिजचे व्रत, मुहूर्त महत्त्व आणि विधी

या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी उपवास करतात. असे मानले जाते की, विवाह इच्छुक मुलींचे लग्न जमत नसल्यास हे व्रत केल्याने लग्नाचा योग्य जुळून येतो. यासोबतच इच्छित वराची प्राप्ती होते.

Kajri Teej 2022: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला करतात कजरी तिजचे व्रत, मुहूर्त महत्त्व आणि विधी
कजरी तिज Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 06, 2022 | 7:00 AM
Share

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी होणारी तीज कजरी तीज (Kajri teej 2022) म्हणून ओळखली जाते. हा सण प्रामुख्याने उत्तर भारतीयांमध्ये साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या दिनदर्शिकेनुसार, कजरी तीज हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी, 14 ऑगस्ट रोजी रविवारी साजरा केला जाईल.  या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी उपवास करतात. असे मानले जाते की, विवाह इच्छुक मुलींचे लग्न जमत नसल्यास हे व्रत केल्याने लग्नाचा योग्य जुळून येतो. यासोबतच इच्छित वराची प्राप्ती होते.

कजरी तीज तिथी

13 ऑगस्टच्या रात्री 12:53 पासून तृतीया तिथी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्टची रात्र 10.35 मिनिटांपर्यंत राहील. यावेळी 14 ऑगस्ट रोजी कजरी तीजचा सण साजरा केला जाणार आहे.

कजरी तीजचे महत्त्व

या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. चंद्रोदयानंतर संध्याकाळी उपवास मोडला जातो. कजरी तीजच्या दिवशी बाजरी, गहू, हरभरा आणि तांदूळ यांच्या पिठामध्ये तूप आणि सुका मेवा मिसळून पदार्थ तयार केले जातात. या दिवशी गायीच्या पूजेलाही महत्त्व आहे.

कजरी तीजची पूजा पद्धत

काजरी तीजच्या दिवशी महिला सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत करतात. त्यानंतर कडुनिंबाच्या झाडाला पाणी, रोळी आणि अक्षत अर्पण करा. यानंतर काजळ व वस्त्र अर्पण करून पुष्प अर्पण करावे. पूजेत वापरल्या जाणाऱ्या कलशावर रोळीने टिका लावून कलव (धागा) बांधावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. सुहासिनीला गोड वस्तू दान करा. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडावा. अविवाहित मुलींना चांगला वर मिळावा म्हणून कजरी तीजचा उपवास ठेवू शकतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.