AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी उलटे चालतो पण तुम्ही सरळ चाला, उलटे चालत शेगाव गाठणाऱ्या बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला

पुण्याच्या फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे गेल्या वीस वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे जात असतात. यंदा त्यांनी विदर्भाची पंढरी शेगावकडे प्रस्थान केले आहे. फुरसुंगी येथून सुमारे 481 किलोमीटरचे अंतर उलटे चालल्यानंतर ते संतनगरीत दाखल झाले आहेत.

मी उलटे चालतो पण तुम्ही सरळ चाला, उलटे चालत शेगाव गाठणाऱ्या बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला
बापूराव गुंडImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 09, 2023 | 2:35 PM
Share

प्रतिनिधी, गणेश सोळंकी

शेगाव : सुमारे पाचशे किलोमीटर उलट पायी चालत जात देवदर्शन करणारे तसेच या उलट पदयात्रेदरम्यान विविध विषयांवर जनजागृतीसाठी प्रसिध्द असलेले पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील भाविक बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (Bapurao Gund) हे पुणे ते शेगाव असे 481 किलोमीटरचे अंतर कापून श्री संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी संतनगरीत पोहोचले. 18 नोव्हेंबर रोजी ते पुणे येथून निघाले होते. उलट पायी चालत असताना त्यांनी देशवासीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. मी उलटा चालतो पण तुम्ही सरळ चाला असं बापूराव म्हणाले.

बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला

पुण्याच्या फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे गेल्या वीस वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे जात असतात. यंदा त्यांनी विदर्भाची पंढरी शेगावकडे प्रस्थान केले आहे. फुरसुंगी येथून सुमारे 481 किलोमीटरचे अंतर उलटे चालल्यानंतर ते संतनगरीत दाखल झाले आहेत. मी हा उलट प्रवास मानवतेच्या कल्यानासाठी करत आहो असे बापूराव म्हणाले. उलट चालण्यामागचा हेतू हा लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणूसकी आपूलकी जपावी, देपल्या देशाचा, आई वडीलांचा आणि भारतीय संस्कृतीचा संन्मान करावा असा संदेश त्यांनी दिला.

यासोबतच त्यांनी स्वच्छतेचादेखील संदेश दिला. आपला कचरा नदी नाल्यात, रस्त्याच्या कडेला टाकू नये. तसेच स्वछतागृहाचा वापर करा असंही त्यांनी सांगितलं. देवाच्या भक्तीसोबतच मी देशाची भक्तीसुद्ध करतो असं म्हणत त्यांनी प्रत्त्येकाला मतदान करण्याचा सल्ला दिला. येणाऱ्या निवडणूकीत मी मतदान करणार आहे तुम्हीसुद्धा मतदान करा तसेच मतदान करताना ते विचारपूर्वक करा असंही बापूराव म्हणाले. वाहतूक नियम पाळण्याचे आवाहनसुद्धा बापूराव यांनी केले आहे.

बापूराव गुंड हे कापड दुकान चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. 20 वर्षापासून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी याच पध्दतीने जाण्याचा त्यांचा शिरस्ता आहे.  उलट पावली चालण्याच्या पध्दतीसह ते या यात्रेत सध्याच्या ज्वलंत विषयांची जनजागृतीही करतात. विशेष म्हणजे त्यांचा हा हटके प्रवास त्यांच्या घरापासून एकट्यानेच सुरू आहे.  मुळगाव फुरसुंगीतून 18 नोव्हेंबरपासून बापूराव गुंड यानी उलट चालण्याच्या यात्रेस सुरूवात केली. तेथुन शिरूर, अहमदनगर, शेवगाव, जालना, देउलगाव राजा मागें चिखली, खामगाव असे सुमारे 481 किमी अंतर चालून ते संतनगरी शेगाव येथे पोहोचले आहेत.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.