AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money Tips: देवघरात ठेवा ही लहानशी गोष्ट, कुबेराच्या कृपेने भरेल तिजोरी!

विष्णू पुराणानुसार देव आणि दानवांनी अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले. ज्या दरम्यान 14 अनमोल रत्ने प्राप्त झाली, त्यात शंख देखील एक अनमोल रत्न होते.

Money Tips: देवघरात ठेवा ही लहानशी गोष्ट, कुबेराच्या कृपेने भरेल तिजोरी!
देवघर Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 02, 2023 | 9:29 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार देव घरात ठेवलेल्या अनेक गोष्टी तुमचे निद्रिस्त नशीब जागृत करू शकतात.  ज्योतीषशास्त्रात (Astro money Tips) काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे कुबेरांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील. त्याचप्रमाणे  देवघरातील मुख्य गोष्ट म्हणजे शंख, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा धार्मिक विधी तसेच शुभ कार्यात शंखनाद अत्यंत पवित्र मानला जाते. यामागे अनेक पौराणिक मान्यता आहेत आणि समुद्रमंथनाची प्रसिद्ध कथा देखील आहे. विष्णू पुराणानुसार देव आणि दानवांनी अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले. ज्या दरम्यान 14 अनमोल रत्ने प्राप्त झाली, त्यात शंख देखील एक अनमोल रत्न होते. या कारणास्तव शंख अत्यंत पवित्र मानला जातो.

काय आहेत शंखासंबंधीत उपाय?

  1.  जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा थकीत कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर तुम्ही सर्व नियम व विधीचे पालन करून तुमच्या पूजागृहात दक्षिणावर्ती शंख स्थापित करा. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असेल तर कुबेर आणि माता लक्ष्मीचा तेथे सदैव वास असतो आणि शुभ फळ प्राप्त होतात अशी धार्मीक श्रद्धा आहे.
  2. तुमच्या पूजागृहात शंख अवश्य ठेवा. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये दररोज शंख वाजविला जातो, तेथे कधीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही. यासोबतच घरामध्ये लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहते.
  3. शंख कधीही रिकामा ठेवू नका. शंख ठेवलेल्या ठिकाणी तांदूळ ठेवा. असे केल्याने कुबेरांचा निवास तुमच्या घरात नेहमी राहील आणि तिजोरी कधीही रिकामी होणार नाही.
  4.  दररोज पूजेनंतर शंखनाद करावा. घरातील वातावरणात शंखध्वनी कायम राहतो. वाईट शक्ती तिथे राहत नाहीत. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
  5. शंखनाद केल्यानंतर तो पाण्याने स्वच्छ धुवावा, यानंतर त्यात पाणी टाकून संपूर्ण घरात (शौचालय वगळता) ते पाणी शिंपडा. असे केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती नांदते. कुटुंबातील सदस्यांच्या एकूण उत्पन्नातही वाढ होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.