AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यू पंचक सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक, चुकूनही करू नका असं काम

2024 या वर्षातील शेवटचा महिना सुरु आहे. या महिन्यात ग्रहाच्या दृष्टीने बऱ्याच उलथापालथी होत आहेत. या महिन्यात सर्वात त्रासदायक पंचक लागणार असून अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. कारण शनिवारी सुरु होणारं पंचक अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊयात काय करायचं आणि काय नाही ते..

मृत्यू पंचक सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक, चुकूनही करू नका असं काम
| Updated on: Dec 04, 2024 | 4:31 PM
Share

हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. काही मुहूर्त टाळले जातात. कारण त्यावेळेस केलेलं कोणतंही कार्य फळास येत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातील पाच दिवस कोणतंही शुभ कार्य करण्यास उचित मानले जात नाहीत. या पाच दिवसांना पचक मानलं जातं. पण हे पंचक कोणत्या वाराला सुरु झालं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यावरूनच शुभ कार्य करू शकतो की नाही हे ठरवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत अवघ्या अडीच दिवसात प्रवास करतो. जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्ररा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून प्रवास करतो. या प्रवासासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो त्याला पंचक संबोधलं जातं. विशेष म्हणजे या प्रवासाला शनिवारी सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे पंचक सर्वात भीतीदायक मानलं जातं.

द्रिक पंचांगानुसार, 7 डिसेंबरला शनिवारी सकाळी 5 वाजून वाजून 7 मिनिटांनी पंचक सुरु होईल. हे पंचक 11 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यातील कोणत्या वाराला पंचक लागतं यावरून त्याची वर्गवारी केली जाते. शनिवारी सुरु होणाऱ्या पंचकाला मृत्यूपंचक संबोधलं जातं. हे पंचक सर्वात त्रासदायक असते. दुसऱ्या पंचकांच्या तुलनेत पाचपट अधिक अशुभ परिणाम देते.

मृत्यू पंचकात अशी कामं करू नका

  • मृत्यू पंचक लागत असल्याने या कालावधीत शुभ कार्य करू नका. अन्यथा त्याची अशुभ फळं मिळतात.
  • मृत्यू पंचक असताना विवाहित स्त्रियांनी सासरी किंवा माहेरीच राहावं. या काळात प्रवास करणं अशुभ मानलं जातं.
  • मृत्यू पंचकात चारपाई, बेड, पलंग बनवणं अशुभ मानलं जातं. इतकंच काय तर घरावर छतही टाकू नये. असं केल्यास घरात सुख शांती राहात नाही. कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावते.
  • पंचक कालावधीत दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. या दिशेला प्रवास केल्यास अपघात होण्याची शक्यता असते. या काळात प्रवास करावाच लागला तर हनुमान चालिसेचं पठण करावं.
  • पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर पंचक दोषापासून वाचण्यासाठी शवासोबत पाच कुश किंवा पिठाचे पुतळे बनवून तिरडीवर ठेवले जातात. तसेच त्याचं विधिवत अंतिम संस्कार केले जातात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.