AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अष्टमीला कन्या पूजन केल्याने मिळेल देवीचा आशीर्वाद, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त

नवरात्रीचे नऊ दिवस भक्ती आणि श्रद्धेने देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या उत्सवात उपवास होम-हवन यासोबतच कन्या पूजनाचे विशेष महत्त्व मानले जाते. तर येत्या अष्टमी तिथीला कन्या पूजन कधी केले जाईल ते जाणून घेऊयात.

अष्टमीला कन्या पूजन केल्याने मिळेल देवीचा आशीर्वाद, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त
Kanya pujan
| Edited By: | Updated on: Sep 26, 2025 | 10:26 PM
Share

नवरात्रोत्सव हा शक्तीची उपासना करण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, तसेच अनेकजण हे नऊ दिवस उपवास करतात. तर या दिवसांमध्ये विशेषतः कन्या पूजनही केले जाते. नवरात्रोत्सवातील हा सर्वात महत्वाचा विधी मानला जातो, कारण त्यात मुलींना देवीचे स्वरूप मानले जातात म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की मुलींचा आदर केल्याने, देवी प्रसन्न होते आणि कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याण देते.

परंपरेनुसार, अनेकजण अष्टमी तिथीला विशेषतः मुलींची पूजा करतात. या वर्षी शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 30 सप्टेंबर मंगळवार रोजी आहे. या दिवशी मुलींची पूजा करणे, त्यांना देवीचे रूप मानणे, अत्यंत शुभ मानले जाते. ही अष्टमी पूजा केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर स्त्री शक्ती आणि त्यांच्या निष्पाप बालपणाच्या आदराचे प्रतीक आहे, जी भक्तांच्या जीवनात देवीचे आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा आणते.

अष्टमी तिथीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

  • ब्रह्म मुहूर्त: सकाळी 5 ते 6.12 पर्यंत असेल.
  • कन्या पूजन मुहूर्त: सकाळी 10.40 ते दुपारी 12.15 पर्यंत.

कन्या पूजनाचे नियम आणि विधी

  • कन्या पूजनासाठी 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना पूजनांसाठी आमंत्रित करावे
  • मुलींसोबतच भैरवाचे रूप मानल्या जाणाऱ्या एका लहान मुलालाही बोलावण्याची परंपरा आहे.
  • सर्वप्रथम, मुलींचे पाय धुवा आणि त्यांचा आदर करा आणि त्यांचे स्वागत करा.
  • नंतर त्यांना स्वच्छ आसनावर बसवा आणि कुंकू आणि अक्षताने गंधक लावा.
  • यानंतर त्यांना हलवा, पुरी, काळे चणे, खीर इत्यादी प्रेमाने खायला द्या.
  • मुलींना दक्षिणा आणि भेटवस्तू द्या आणि त्यांना आदराने निरोप द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

अष्टमी तिथीचे महत्त्व

अष्टमी तिथीचे स्वतःचे महत्त्व आहे. हा नवरात्रीचा मुख्य दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाला महाअष्टमी असेही म्हणतात. या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. महागौरीला पवित्रता, शांती आणि करुणेची देवी मानले जाते. अष्टमीला मुलींची पूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद, समृद्धी आणि शुभता येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....