AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!

राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी त्याच बरोबरीने नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाबाबत कटीबध्द असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे.

Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 10, 2022 | 1:18 PM
Share

पंढरपूर :  (Aashadhi Wari) आषाढी वारीसाठी सबंध राज्यभरातून 10 लाखाहून अधिक भाविक हे (Pandharpur) पंढरपुरात दाखल होत असतात. शिवाय वारकऱ्यांची जबाबदारी ही (Administration) प्रशासनावर असते. आषाढी वारीच्या अनुशंगाने नियोजन करण्यासाठी प्रशसानाला 3 कोटीचा निधी दिला जातो पण वाढती संख्या आणि मूलभूत सोई सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून आता आगामी वर्षापासून राज्य सरकार हे 5 कोटीच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातच केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अधिक सोई-सुविधा पुरविता येणार आहे.

जनेतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध

राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी त्याच बरोबरीने नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाबाबत कटीबध्द असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. जनतेच्या अपेक्षा वाढणे हे साहजिक आहे पण केंद्राची मदत आणि राज्याचा जेडीपी यामुळे हे शक्य असल्याचेही ते म्हणाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री पदावर असलो तरी महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याचेही शिंदे म्हणाले आहेत.

शासन आणि प्रशासन हेच मुख्य घटक

शासन आणि प्रशासन हे रथाची दोन चाके आहेत. सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जात असल्या तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम हे प्रशासकिय अधिकारी करीत असतात. त्यामुळे हा घटक देखील महत्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या नियोजनाचे कौतुक केले आहे. सबंध वारीतील नियोजन योग्यरित्या झाले आहे. शिवाय वारकऱ्यांच्या सोई-सुविधांसाठी कुठेही कमतरता राहणार नाही. त्यामुळेचे शासकीय निधीमध्ये वाढ केली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

पंढरपूर गोर गरिबांचे दैवत

पंढरपूर हे एक असे तीर्थक्षेत्र आहे जिथे कितीही वारकरी आले तरी समावून घेण्याची क्षमता आहे. गेल्या 15 दिवसांपासून पंढरपूरकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वारकऱ्यांची गर्दी होती. विठ्ठल आणि वारकरी याचे नाते हे वेगळे असून ते अधिक दृढ करणे ही प्रशसनाचा जबाबदारी आहे. त्यामुळे सोई-सुविधांमध्ये कुठेही कमी होता कामा नये अशा सूचनाही शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...