AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं कडं घालणे मानले जाते शुभ, आहेत अनेक फायदे

आपल्यापैकी बरेच जण चांदीचे दागिने घालतात. ज्योतिषशास्त्रानूसार चांदीचा धातू खूप शुभ मानला जातो. तर आजच्या लेखात आपण चांदीचं कडं कोणत्या राशीच्या लोकांनी घालणे शुभ आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.

'या' राशीच्या लोकांनी चांदीचं कडं घालणे मानले जाते शुभ, आहेत अनेक फायदे
silver braceletsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Feb 05, 2026 | 11:06 AM
Share

ज्योतिषशास्त्रात सोने, चांदी, तांबे आणि पितळ यासारखे धातू महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे असे मानले जाते की चांदीचं कडं घालणे हे काही राशीच्या लोकांना खूप शुभ आहे. यामुळे शरीर आणि मन संतुलित राहते. कारण चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अधिक तणाव किंवा मानसिक शांतीचा अभाव जाणवत असेल तर चांदीचं कडं घालणे हे खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच नियमित चांदीचा कडं परिधान केल्याने दिवसांची सुरुवात आनंदी होऊ शकते. कोणीही चांदीचं कडं घालू शकतो, परंतु काही राशींसाठी ते खूप शुभ मानले जाते. तर आजच्या या लेखात कोणत्या राशींसाठी चांदीचं कडं खरोखरच एक आशीर्वाद आहे ते जाणून घेऊयात.

कर्क रास

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत जन्मलेल्यांसाठी चांदीचं कडं असो वा ब्रेसलेट हे घालणे खूप शुभ मानले जाते, कारण चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे. म्हणून चांदीचे ब्रेसलेट किंवा कडं घातल्याने या राशींच्या लोकांचे मन स्थिर राहते आणि तणाव कमी होतो.

वृषभ रास

या व्यतिरिक्त वृषभ राशीत जन्मलेले लोक चांदीचं कडं घालू शकतात, कारण शुक्र हा वृषभ राशींचा स्वामी ग्रह आहे आणि या राशीत जन्मलेल्या लोकांना भौतिक सुखसोयी खूप आवडतात, त्यामुळे चांदीचा कडं घातल्याने त्यांच्या आयुष्यात आनंद आणि शांती टिकून राहते आणि त्यांचे नशीब साथ देते.

तुला आणि वृश्चिक रास

तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांदीचं कडं घालणे शुभ मानले जाते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो, तसेच आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढते आणि शांततेची भावना मिळते.

चांदीचा कडं घालण्याचे फायदे

चांदीचं कडं घातल्याने तणावाची समस्या दूर राहते.

मानसिक शांती अबाधित राहते.

करिअर आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात.

पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या दिवशी चांदीचं कडं घालावं?

सोमवार आणि शुक्रवार या दिवशी चांदीचं कडं घालण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. कारण सोमवार हा भगवान शिव यांना प्रिय आहे. चांदीचा संबंध शुक्र ग्रहाशी देखील आहे. म्हणून शुक्रवारी चांदीचा कडं घालणे शुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?.
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल.
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु.