AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradosh vrat : या तारखेला आहे वैशाख महिन्याचा पहिला प्रदोष व्रत, तिथी मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

यावेळी प्रदोष व्रताच्या दिवशी पंचक असण्याबरोबरच शिववास आणि सोमवारचा योगायोगही कायम राहिला. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो.

Pradosh vrat : या तारखेला आहे वैशाख महिन्याचा पहिला प्रदोष व्रत, तिथी मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
प्रदोष व्रतImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 11, 2023 | 10:23 PM
Share

मुंबई : महादेवाच्या पूजेला शास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यापैकी एक प्रदोष व्रत आहे. हे व्रत कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. त्याचबरोबर यावर्षी वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत (Pradosh Vrat) 17 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. मात्र यावेळी प्रदोष व्रताच्या दिवशी पंचक असण्याबरोबरच शिववास आणि सोमवारचा योगायोगही कायम राहिला.  सोमप्रदोषच्या दिवशी उपवास करून जो कोणी भगवान शंकराची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. चला जाणून घेऊया या व्रताची शुभ मुहूर्त आणि तिथी.

प्रदोष कालावधी

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 17 एप्रिल रोजी दुपारी 03.45 वाजता सुरू होत आहे. त्याच वेळी, ही तारीख दुसऱ्या दिवशी मंगळवारी, 18 एप्रिल रोजी दुपारी 01.27 वाजता संपत आहे.

उपवास शुभ वेळ

प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.47 ते रात्री 9.02 पर्यंत राहील. म्हणजे प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त सुमारे अडीच तासांचा असेल.

उपवासाचे महत्त्व

प्रदोष व्रत पाळल्याने मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच चंद्र ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण सोम प्रदोष व्रत आहे. तर या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.

सोम प्रदोष व्रत पूजा विधी

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष व्रतात महादेवाचा अभिषेक करुन बिल्व पत्र अर्पित करावे. शिव मंत्रांचा जप करावा. जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी.

सोम प्रदोष कथा

पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतींचं निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं. ती स्वत: आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. दिवस सरत असताना एके दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे-तिकडे फिरत होता.

राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला. मग एके दिवस अंशुमति नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले ती त्याला मोहित झाली. दुसर्‍या दिवशी अंशुमति तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई-वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले.

ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमारने ब्राह्मण-मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले.

या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणार्‍या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.