AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नापूर्वी ‘या’ तीन प्रश्नांची उत्तरे विचारा, त्यानंतर… चाणक्य नीतीत असं काय सांगितलं?

लग्नापूर्वी या तीन प्रश्नांची उत्तरे विचारल्यास तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत आणि टिकाऊ राहील, असं चाणक्य सांगतात. विवाह दोन कुटुंबांचा मिलाफ आणि दोन व्यक्तींच्या जीवनाचा नवा अध्याय असतो. काही वेळा, जोडीदारांमध्ये काही गोष्टी स्पष्ट न झाल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच चाणक्य काही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करतात, जे लग्नापूर्वी विचारल्यास तुमच्या भविष्यकाळातील वैवाहिक जीवनाला स्थिरता मिळू शकते.

लग्नापूर्वी 'या' तीन प्रश्नांची उत्तरे विचारा, त्यानंतर... चाणक्य नीतीत असं काय सांगितलं?
चाणक्य नीतीशास्त्राप्रमाणे गाढवाकडून कठोर परिश्रमाचा गुण घेतला पाहिजे. ऋतु कोणताही असो त्याची तमा न बाळगता, प्रत्येकाने संकटांचा सामना तर करावाच पण आपल्या लक्ष्यावरून विचलित होऊ नये.
| Updated on: Nov 29, 2024 | 6:30 PM
Share

आपल्याकडे लग्न संस्था ही अत्यंत पवित्र मानली जाते. या नात्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. पती-पत्नी दोघेही या बंधनात अडकल्यानंतर सुखी संसार करू लागतात. त्यांच्या वंशाचा विस्तार करतात. खऱ्या अर्थाने दोन जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो. परंतु काही वेळा, जोडीदारांमध्ये काही गोष्टी मूक राहिल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळेच आचार्य चाणक्य यांनी विवाहाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या या तीन प्रश्नांची उत्तरे लग्नापूर्वी विचारल्यास, भविष्यकाळातील वैवाहिक जीवन सुखी आणि शांततेत राहू शकते.

वयाचं अंतर समजून घ्या :

लग्न करण्यासाठी दोन्ही व्यक्तींचं वय कधीही अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य वयाच्या अंतरावर असलेली जोडपी एकमेकांच्या मानसिकतेला आणि विचारशक्तीला चांगले समजू शकतात. परंतु वयाचं जास्त अंतर असलेल्या जोडप्यांमध्ये विचारांच्या स्तरावर फरक असतो, ज्यामुळे समजून घेण्यात अडचणी येतात. वयाच्या अंतरामुळे संबंध लवकर तुटण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे, विवाहासाठी योग्य वयाचं अंतर आहे का, हे दोन्ही व्यक्तींनी ठरवून विचारले पाहिजे, असं चाणक्य सांगतात.

प्रकृतीची माहिती घ्या :

चाणक्य म्हणतात, ज्याच्या सोबत तुम्ही विवाह करणार आहात, त्याच्या आरोग्याची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. विवाहापूर्वी जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं आहे. जर त्याला काही आरोग्य समस्या असतील तर भविष्यात त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. हे माहिती घेऊनच निर्णय घेणं योग्य ठरेल, असे चाणक्य म्हणतात.

जुन्या नात्याबद्दल विचार करा :

मुली किंवा मुलं विवाहासाठी तयार होताना, त्यांच्या जुन्या संबंधांची माहिती घेणं आवश्यक आहे. जर त्यांच्या आधीचे काही नाते होते, तर ते नाते का तुटले? आणि त्या व्यक्तीसोबत सध्या त्यांचे कोणतेही संबंध आहेत का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे प्रश्न तुमच्या भविष्यातील वैवाहिक जीवनात कोणत्याही शंका निर्माण होऊ नये म्हणून विचारले पाहिजेत. जर हे सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितले, तर तुमचा भविष्यकाळाचा संबंध अधिक सुखी आणि शांततेत राहू शकतो.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.