AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : संकट काळात संयम ठेवायला शिकवतील प्रेमानंद महाराज यांचे हे विचार

प्रेमानंद महाराज म्हणतात आयुष्य हे तुम्ही विचार करता तितकं साधं, सरळ, सोपं नक्कीच नसतं. आयुष्यात अनेक संकट येतात, मात्र तुम्ही जर तुमच्या आयुष्यात संयम ठेवला तर तुम्ही प्रत्येक संकटावर सहज मात करू शकाल, जो संयम ठेवतो, त्याचा शेवटी विजय नक्की होतो.

Premanand Maharaj : संकट काळात संयम ठेवायला शिकवतील प्रेमानंद महाराज यांचे हे विचार
प्रेमानंद महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2025 | 7:38 PM
Share

यशाचा मार्ग तुम्ही जेवढा विचार करता तेवढा सोपा नसतो. आयुष्यात चढ -उतार हे येतच असतात. कधीकधी देव तुमची अशी परीक्षा पहातो की एका विशिष्ट क्षणी तुम्ही तुमचा संयम गमावून बसतात. मात्र आत्मविश्वास, दृढनिश्चय, देवावर विश्वास आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. अनेकदा असं होतं की तुम्ही खूप कष्ट करत आहात, मात्र तुम्हाला वारंवार अपयश येत आहे, त्यामुळे तुम्ही निराश होता. अशा परिस्थितीमध्ये योग्य विचार आणि देवावर असलेला विश्वास यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. संत प्रेमानंद महाराज यांचे प्रसिद्ध कोट लोकांना जगण्याची प्रेरणा देतात, निराश झालेल्या लोकांना आशेचा किरण दाखवतात, असेच काही प्रसिद्ध कोट आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही कठोर परिश्रम करा आणि देवावर विश्वास ठेवा, हेच तुमच्या आयुष्यातील यशाचं आणि आनंदाचं गमक आहे – प्रेमानंद महाराज

जो दुसऱ्याला कष्ट देऊन स्वत: आनंदी होतो, तो आपल्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, मात्र जो दुसऱ्याचे दु:ख वाटून घेतो, त्याला मदत करतो, तो आयुष्यात प्रगती करतो – प्रेमानंद महाराज

विजयी तोच होतो जो सातत्यानं कठोर परिश्रम करतो, स्वत:मध्ये काळानुरूप बदल घडून आणतो. व्यक्ती आपल्या मेहनतीमुळेच हिऱ्यासारखं चमकतो – प्रेमानंद महाराज

खरं प्रेम हे एकच असते, हजारो नाही – प्रेमानंद महाराज

भूतकाळाचं दु:ख करू नका अन् वर्तमान व भविष्याची चिंता देखील करू नका, फक्त देवावर विश्वास ठेवा आणि कर्म करत रहा, तुम्हाला यश नक्की मिळणार

प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वत:ला आनंदी ठेवायला शिका, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही देवाबरोबर जोडले जाल – प्रेमानंद महाराज

भविष्य काळाची चिंता करू नका, देवावर विश्वास ठेवा, संयम ठेवा आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतील – प्रेमानंद महाराज

तुम्हाला जेव्हा कठोर परिश्रम करून देखील अपयश येत तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढचा दिवस तुमचा असणार आहे, त्यामुळे संयम ठेवा- प्रेमानंद महाराज

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)

Follow Us
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना