AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांना एका महिलेनं विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचा संबंध राहतो का की पूर्णपणे तुटतो? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत जे काही सांगितलं त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
Premanand MaharajImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 14, 2025 | 4:12 PM
Share

जीवन आणि मृत्यू हे या जगातील फार मोठे सत्य आहे. जीवन आणि मृत्यू सत्य असल्याबरोबरच एक असे रहस्यही आहे, जे आजपर्यंत कोणालाही समजलेले नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांशी जोडलेली असते. अशा वेळी मनात हा प्रश्न नक्कीच येतो की मृत्यूनंतरही संबंध शिल्लक राहतात का? आत्म्याला आपले कुटुंब, आपली ओळख आणि भावना आठवतात का? अशाच प्रकारचा प्रश्न एका महिलेने प्रेमानंद महाराजांना विचारला. तिने महाराजांना विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते का की एकदम तुटते? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले. सांगितलं की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही.

मृत्यूनंतर कोणतीही आठवण शिल्लक राहत नाही – प्रेमानंद महाराज

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही. प्रेमानंद महाराज म्हणाले की त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही कोणत्याही प्रकारची आठवण शिल्लक राहत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की खोल झोपेत व्यक्तीला संस्कारांमुळे काही स्वप्ने दिसतात, पण गाढ निद्रेत काहीच आठवत नाही. मृत्यू त्याहूनही खोल अवस्था मानली जाते, जिथे सर्व प्रकारच्या आठवणी संपुष्टात येतात. आईच्या गर्भात मूल नऊ महिने राहते, पण बाहेर आल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही.

आत्मा कर्मांचा प्रभाव सोबत घेऊन जाते

अशा प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सांसारिक मोह कमी होतो. ना कुटुंब, ना पत्नी-मुले, ना संपत्ती, ना बँक बॅलन्स, ना पद-प्रतिष्ठा, सर्व काही मृत्यूबरोबरच संपून जाते. आत्म्याबरोबर प्रवासात फक्त त्याच्या कर्मांचा प्रभाव जातो. बाकी सर्व संबंध आणि ओळख संपुष्टात येते. व्यक्ती जगात आल्यानंतरच त्याचे संबंध सुरू होतात. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की संबंधांचा आधार शरीर आणि परिस्थिती असते. जेव्हा व्यक्तीचे शरीर संपते, तेव्हाच संबंधांचे बंधनही संपुष्टात येते.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.