AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

भाऊ बहिणीचं नातं हे एक अनोखे नाते आहे. ते एकमेकांशी भांडतातही आणि तितकंच प्रेमही करतात. हिंदू धर्मात एक असा खास सण आहे जो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तो सण म्हणजे रक्षाबंधन आहे. ज्यात बहीण तिच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
RAKHI
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 12:41 PM
Share

मुंबई : भाऊ बहिणीचं नातं हे एक अनोखे नाते आहे. ते एकमेकांशी भांडतातही आणि तितकंच प्रेमही करतात. हिंदू धर्मात एक असा खास सण आहे जो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तो सण म्हणजे रक्षाबंधन आहे. ज्यात बहीण तिच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. या पौर्णिमेला राखीपौर्णिमा देखील म्हणतात. यावेळी रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल. या दिवसाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील

रक्षा मंत्राचा जप करा –

येन बुद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल| तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल||

या श्लोकानुसार, बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना म्हणते की, मी तुला त्याच संरक्षण सूत्रात बांधते ज्यामध्ये महान राजा बलिला बांधण्यात आले होते. हे राखी, तू ठाम राहा. आपल्या बचावाच्या संकल्पाने कधीही विचलित होऊ नको. या इच्छेसह, बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.

या उत्सवाची तयारी आधीच सुरु होऊन जाते. यासाठी कुमकुम, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी एका थाळीमध्ये ठेवा. भावाला टिळा लावा आणि त्याच्या मनगटावर राखी बांधा. भावाची आरती करा, त्याला मिठाई खायला द्या. राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणीला त्यांच्या क्षमतेनुसार भेटवस्तू दिल्या पाहिजेत.

पौराणिक कथा काय?

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू राजा बलिच्या सांगण्यावरुन पाताळात गेले होते. तेव्हा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला त्याने संरक्षक धागा बांधून विष्णूला मागितले होते. या व्यतिरिक्त, आणखी एक आख्यायिका आहे. राजसूयच्या यज्ञात द्रौपदीने राखीऐवजी तिच्या पदराचा तुकडा भगवान श्रीकृष्णाला बांधला होता. मान्यता आहे की की तेव्हापासूनच बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Kamika Ekadashi 2021 | कामिका एकादशी, जाणून घ्या या एकादशीची कथा आणि महत्त्व

Peepal Tree Upay | संतानप्राप्ती, धन लाभ आणि मंगळ दोष निवारणासाठी पिंपळाच्या झाडाचे ‘हे’ उपाय करा

Follow Us
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.