AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर श्री रामाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य, काय आहे याचे महत्त्व?

हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो.

Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर श्री रामाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य, काय आहे याचे महत्त्व?
बनारसी पानImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 06, 2024 | 8:07 AM
Share

अयोध्या : 2024 चा पहिला महिना ऐतिहासिक असणार आहे. 22 जानेवारीला राम नगरी अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा होणार आहे. यासाठी शासन आणि प्रशासन दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. प्राणप्रतिष्ठा अनेक मोठ्या विधींनी केली जाईल. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद असा असेल आणि हा कालावधी एकूण 84 सेकंदांचा आहे. प्रभू रामाला 56 प्रकारचे नैवेद्य दाखवल्या जाणार आहे. यापैकी एक म्हणजे मसाला बनारसी पान. होय, फक्त एक पान नाही तर 151 पानांना नैवेद्य दाखवला जाणार आहे. यामागील धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.

पानाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासह अनेक देवता विड्याच्या पानात वास करतात असे मानले जाते. त्यामुळे राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी विड्याची पानंही अर्पण करण्यात येणार आहे.

बनारसचे खास पान

रामललाच्या अभिषेक प्रसंगी, बनारसमधून 151 विशेष विड्याच्या पानांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.  151 पानांव्यतिरिक्त 1000 पानांची ऑर्डर देण्यात आली आहे जी भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाईल. प्रसादासाठी हे पान बनारसच्या रिंकू चौरसिया बनवणार आहेत. असे म्हटले जाते की त्यांच्या दोन पिढ्या बऱ्याच काळापासून श्रीरामांना विड्याची पानं पाठवत होत्या.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.