AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan 2023 : श्रावण महिन्यात का करू नये मांसाहार, हे आहे शास्त्रीय कारण

श्रावण महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे तितकाच आरोग्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. या काळात मांसाहार करण्यास मनाई करण्यात येते. यामागे शास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Shrawan 2023 : श्रावण महिन्यात का करू नये मांसाहार, हे आहे शास्त्रीय कारण
मांसाहारImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 07, 2023 | 10:08 PM
Share

मुंबई : धार्मिक दृष्टीकोणातून श्रावण महिन्याचे (Shrawan 2023) अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्याच प्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा महिना महत्त्वाचा मानल्या जातो . या ऋतूत भगवान शंकराच्या उपासनेमुळे धार्मिक दृष्टिकोनातून मांसाहार निषिद्ध आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या महिन्यात मांसाहार करू नये. या महिन्यात हलका पाऊस पडतो. वातावरणात बुरशी आणि विषाणूंचे संक्रमण वाढू लागते. अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात, कारण सूर्य-चंद्राच्या प्रकाशाची कमतरता असते, त्यामुळे अन्नपदार्थ लवकर संक्रमित होतात.

पचनशक्ती कमकुवत होते

श्रावण महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो, ज्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते. मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये सडण्यास सुरुवात होते. पोट जड वाटू लागते. आपले संपूर्ण शरीर आपल्या पाचक अग्नीवर अवलंबून असल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. अग्नीच आपल्या शरीरातील सात धातू बनविण्यास सक्षम आहे. दुसऱ्या शब्दांत, पाचक अग्नीच आपल्या सात धातूंची गुणवत्ता ठरवते.

प्राणी देखील आजारी पडतात

वातावरणात कीटक आणि विषाणूंची संख्या वाढते. डेंग्यू, चिकनगुनियासारखे अनेक आजार होऊ लागतात, ज्यामुळे जनावरेही आजारी पडतात. त्यांचे मांस खाणे हानिकारक आहे.

आपली पाचक अग्नी काय आणि कशी असते

  • सम अग्नि: यामध्ये आपली पचनक्रिया सामान्य असते, अन्न पचायला 5 ते 6 तास लागतात.
  • मंद अग्नि: यामध्ये पचनास 7 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे आपले अन्न आतमध्ये सडते आणि अनेक रोग होतात. यावेळी उशिरा पचणारे अन्न घेऊ नये. जनावरे जे गवत खातात, त्यासोबत अनेक विषारी किडे खातात, त्यामुळे जनावरे आजारी पडतात. त्यांनाही संसर्ग होतो. प्राण्यांचे मांस शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते.
  • विषम अग्नि: अन्न पचायला ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. श्रावण महिन्याच्या काळात मासे अंडी घालतात, त्याचे सेवन हानिकारक असते. याच्या सेवनाने आजार होण्याचा धोका असतो. हा काळ गर्भधारणेचा आणि इतर प्राण्यांच्या पुनरुत्पादनाचा असतो. त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, यावेळी मांसाहार योग्य नसतो.

या ऋतूत कोणत्या औषधी वनस्पतींचे सेवन करावे

श्रावण महिन्यात गिलोय, कडुलिंब, तुळशी, चित्रक, दालचिनी, पिपली, बडीशेप, खडे मीठ खावे जेणेकरून पचनशक्ती चांगली राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.