AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य नीती: ‘या’ लोकांचा सहवास तुमचे जीवन मृत्यूपेक्षाही बनवू शकतो वाईट, अंतर राखणे उत्तमच

आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमुळे तुम्हाला जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यास मदत होऊ शकते. चाणक्य यांच्या धोरणांमध्ये जीवनाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली जाते. आजच्या लेखात आपण आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांपासूप दूर राहण्याचा सल्ला दिला आहे जे तुमचे जीवन खूप वाईट बनवत आहेत. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

चाणक्य नीती: 'या' लोकांचा सहवास तुमचे जीवन मृत्यूपेक्षाही बनवू शकतो वाईट, अंतर राखणे उत्तमच
acharya-chanakyaImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 15, 2025 | 2:07 PM
Share

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ञ होते. सोबतच ते अर्थतज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आचार्य चाणक्य नीती नावाचा एक ग्रंथ देखील लिहिला आहे. या चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्वे आहेत जी तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारली तर तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. आजच्या लेखात आपण चाणक्य यांनी सांगितलेल्या काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून तुम्ही शक्य तितक्या लवकर या लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे.

या लोकांपासून दूर राहा

आचार्य चाणक्य म्हणतात की जे तुम्हाला पाठिंबा देण्यास नकार देतात किंवा वेळ आल्यावर तुम्हाला सोडून देतात त्यांच्यापासून अंतर राखणे चांगले. आचार्य चाणक्य मानतात की मित्र असो वा नातेवाईक कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख तुम्ही संकटात असतात तेव्हाच होते.

जीवनात अडचणी वाढतात

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जर कोणी तुमचा सतत अपमान करत असेल, तुम्हाला दुखावत असेल किंवा तुमच्या भोवती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून लगेच दूर जावे, मग ते कितीही जवळचे असले तरी. कारण अशी लोकं केवळ आपला आत्मविश्वास कमी करत नाहीत तर जीवनात अडचणी देखील निर्माण करतात.

तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

आचार्य चाणक्य असेही सांगतात की तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असणे देखील खूप धोक्याचे आहे जी सतत तुमच्याबद्दल वाईट बोलते किंवा मत्सर आणि द्वेषाच्या भावना बाळगते. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यावर ओझ्यापेक्षा कमी नाही. शिवाय कायद्याची किंवा सार्वजनिक लज्जेची भीती नाही अशा व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवणे चांगले , कारण याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

असे लोक मित्र नसून शत्रू असतात

आचार्य चाणक्य यांच्या मते असा मित्र जो तुमच्या समोर चांगले वागतो पण तुमच्या मागे वाईट बोलतो तो शापापेक्षा कमी नाही. असा मित्र शत्रूपेक्षा कमी नाही. म्हणूनच चाणक्य सल्ला देतात की जर तुमच्या आयुष्यात असे मित्र असतील तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहावे, अन्यथा तुम्ही जिवंतपणी नरकाचा अनुभव घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.