AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळागौरी व्रतामागे आहे ही कथा; जाणून घ्या तिथी, पूजा विधीचे महत्त्व

मंगळागौरी व्रत हिंदूंमध्ये सर्वात शुभ व्रतांपैकी एक मानले जाते. हे प्रामुख्याने विवाहित महिलांनी पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी केले आहे. जे गोंधळलेल्या मनस्थितीवर मात करण्यासाठी तसेच महिलेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्तीचे प्रतीक आहे.

मंगळागौरी व्रतामागे आहे ही कथा; जाणून घ्या तिथी, पूजा विधीचे महत्त्व
मंगळागौरी व्रतामागे आहे ही कथा
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 10:16 PM
Share

मुंबई : श्रावण महिना हा भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. हा सण उत्तर आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये अर्थात दोन्ही भागांमध्ये साजरा केला जातो. परंतु उत्तर भारतामध्ये पौर्णिमांत दिनदर्शिकेचे पालन केले जाते, तर दक्षिण भारतात अमन दिनदर्शिकेचे पालन करण्यात येते. त्यामुळेच श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पंधरा दिवसांचे अंतर असते. श्रावण महिन्यात पुरुष भक्त मंडळी भगवान शिवशंकरांची पूजा करतात, तसेच महिला वर्ग श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी व्रत पाळतात. आता आगामी मंगळागौरी व्रत 3 ऑगस्ट 2021 रोजी आहे. (This is the story behind Mangalagauri Vrata; know the importance of Tithi, Pooja ritual)

मंगळागौरी व्रत : महत्वाच्या वेळा

सूर्योदय – सकाळी 06:27

सूर्यास्त – सायंकाळी 06:22 संध्या

राहू काळ – दुपारी 03:23 – दुपारी 04:53

अमृत काळ – सकाळी 08:38 – रात्री 10:26

अभिजीत मुहूर्त – दुपारी 12:01 – दुपारी 12:48

मंगळागौरी व्रत : महत्त्व

मंगळागौरी व्रत हिंदूंमध्ये सर्वात शुभ व्रतांपैकी एक मानले जाते. हे प्रामुख्याने विवाहित महिलांनी पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी केले आहे. जे गोंधळलेल्या मनस्थितीवर मात करण्यासाठी तसेच महिलेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्तीचे प्रतीक आहे. अविवाहित मुली त्यांना हवा असलेला जीवनसाथी मिळवण्यासाठी उपासना आणि उपवासही करू शकतात.

मंगळागौरी व्रताची कथा

एकेकाळी तेथे एक श्रीमंत व्यापारी धरमपाल राहत होता. त्याची बायको खूप सुंदर होती व तो आपल्या शांतीपूर्ण आयुष्यात आनंदी होता. बरीच वर्षे प्रार्थना केल्यावर दोघांना पुत्रप्राप्ती झाली, पण त्यांना शाप मिळाला. त्या मुलाचा वयाच्या 16 व्या वर्षी सर्पदंशाने मृत्यू होईल, असे भाकीत काही ज्योतिषांनी केले होते. सुदैवाने, त्याने वयाच्या सोळाव्या वर्षापूर्वीच एका मुलीशी लग्न केले. त्या मुलीची आई मंगळागौरी व्रत ठेवायची. हे व्रत अत्यंत फलदायी असल्याने तिच्या मुलीला सुखी आयुष्य लाभले आणि तिचा पती शापातून वाचला. परिणामी तो आनंदी जीवन जगला.

मंगळागौरी व्रत विधी

– सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे. – लाकडी पाटावर लाल कापड घालणे – त्यावर पार्वती आणि गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे – गव्हाच्या पिठाच्या दिव्याने पूजा करणे – हळद, कुमकुम, अक्षत, सुपारी आणि सिंदूर इ. लावणे – मंगळा गौरी स्तोत्राचे पठण केले जाते. – नैवेद्य अर्पण केला जातो. – मंगळागौरीची आरती केली जाते. – नकळत पाप आणि चुकांसाठी हात जोडून क्षमा मागणे. – दुसऱ्या दिवशी नदी किंवा तलावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करणे

महागौरी मंत्र

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।। (This is the story behind Mangalagauri Vrata; know the importance of Tithi, Pooja ritual)

इतर बातम्या

पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”

CBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.