AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?

हिंदू धर्मात कपाळावर टिळक लावण्याला विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे टिळक लावण्याबद्दल धर्मात महत्व सांगण्यात आले आहे.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?
कपाळावर टिळक का लावतात?Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 13, 2023 | 7:08 PM
Share

मुंबई, कपाळावर टिळा किंवा टिळक (Tilak Upay) लावण्याचे सनातन धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, कपाळावर टिळक लावल्याने सकारात्मकता येते आणि कुंडलीत उपस्थित अग्निमय ग्रह शांत होतात. सामान्य दिवशी किंवा कोणत्याही विशेष सणावर वेगवेगळ्या प्रकारचे टिळक वापरले जातात. यापैकी चंदनाचा टिळक सर्वात फायदेशीर मानला जातो. चंदनाचा तिलक लावणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चला जाणून घेऊया कपाळावर टिळक का लावतात आणि त्याचे फायदे काय आहेत.

कपाळावर टिळक लावण्याचे धार्मिक महत्त्व

कपाळावर टिळक लावण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. टिळक लावल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि अडलेली कामेही पुर्ण होण्यास मदत होते. दिवसानुसार टिळक लावल्यास शुभ फळ मिळते. असे मानले जाते की, सोमवारी श्वेत चंदनाचा तिलक लावल्याने मन शांत राहते. दुसरीकडे, मंगळवारी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळणे शुभ असते. बुधवारी कोरडे सिंदूर लावल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होते. गुरुवारी पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

शुक्रवारी लाल चंदन किंवा कुंकुम तिलक लावल्याने घरात समृद्धी येते. शनिवारी भस्म तिलक लावल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. रविवारी लाल चंदन लावल्याने व्यक्तीला मान-सन्मान आणि धनाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार जो व्यक्ती चंदनाचा टिळक लावतो त्याच्या घरात अन्न-धान्य आणि सौभाग्य वाढते.

टिळक लावण्याचे वैज्ञानिक महत्त्व

शास्त्रीय आधारावरही टिळकांचा आचरण करण्याचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर टिळक लावल्याने मेंदूला शीतलता मिळते असे म्हणतात. त्यामुळे माणसाला एकाग्रता साधणे सोपे जाते. असे म्हणतात की कपाळावर टिळक लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आपले निर्णय अगदी ठामपणे घेतो. चंदनाचा तिलक लावल्याने मेंदूला थंडावा मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?