AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?

हिंदू धर्मात कपाळावर टिळक लावण्याला विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे टिळक लावण्याबद्दल धर्मात महत्व सांगण्यात आले आहे.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?
कपाळावर टिळक का लावतात?Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 13, 2023 | 7:08 PM
Share

मुंबई, कपाळावर टिळा किंवा टिळक (Tilak Upay) लावण्याचे सनातन धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, कपाळावर टिळक लावल्याने सकारात्मकता येते आणि कुंडलीत उपस्थित अग्निमय ग्रह शांत होतात. सामान्य दिवशी किंवा कोणत्याही विशेष सणावर वेगवेगळ्या प्रकारचे टिळक वापरले जातात. यापैकी चंदनाचा टिळक सर्वात फायदेशीर मानला जातो. चंदनाचा तिलक लावणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चला जाणून घेऊया कपाळावर टिळक का लावतात आणि त्याचे फायदे काय आहेत.

कपाळावर टिळक लावण्याचे धार्मिक महत्त्व

कपाळावर टिळक लावण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. टिळक लावल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि अडलेली कामेही पुर्ण होण्यास मदत होते. दिवसानुसार टिळक लावल्यास शुभ फळ मिळते. असे मानले जाते की, सोमवारी श्वेत चंदनाचा तिलक लावल्याने मन शांत राहते. दुसरीकडे, मंगळवारी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळणे शुभ असते. बुधवारी कोरडे सिंदूर लावल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होते. गुरुवारी पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

शुक्रवारी लाल चंदन किंवा कुंकुम तिलक लावल्याने घरात समृद्धी येते. शनिवारी भस्म तिलक लावल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. रविवारी लाल चंदन लावल्याने व्यक्तीला मान-सन्मान आणि धनाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार जो व्यक्ती चंदनाचा टिळक लावतो त्याच्या घरात अन्न-धान्य आणि सौभाग्य वाढते.

टिळक लावण्याचे वैज्ञानिक महत्त्व

शास्त्रीय आधारावरही टिळकांचा आचरण करण्याचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर टिळक लावल्याने मेंदूला शीतलता मिळते असे म्हणतात. त्यामुळे माणसाला एकाग्रता साधणे सोपे जाते. असे म्हणतात की कपाळावर टिळक लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आपले निर्णय अगदी ठामपणे घेतो. चंदनाचा तिलक लावल्याने मेंदूला थंडावा मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.