AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?

हिंदू धर्मात कपाळावर टिळक लावण्याला विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे टिळक लावण्याबद्दल धर्मात महत्व सांगण्यात आले आहे.

Tilak Upay: कपाळावर का लावला जातो टिळक? काय आहे यामागचे धार्मिक कारण?
कपाळावर टिळक का लावतात?Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 13, 2023 | 7:08 PM
Share

मुंबई, कपाळावर टिळा किंवा टिळक (Tilak Upay) लावण्याचे सनातन धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, कपाळावर टिळक लावल्याने सकारात्मकता येते आणि कुंडलीत उपस्थित अग्निमय ग्रह शांत होतात. सामान्य दिवशी किंवा कोणत्याही विशेष सणावर वेगवेगळ्या प्रकारचे टिळक वापरले जातात. यापैकी चंदनाचा टिळक सर्वात फायदेशीर मानला जातो. चंदनाचा तिलक लावणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चला जाणून घेऊया कपाळावर टिळक का लावतात आणि त्याचे फायदे काय आहेत.

कपाळावर टिळक लावण्याचे धार्मिक महत्त्व

कपाळावर टिळक लावण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. टिळक लावल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि अडलेली कामेही पुर्ण होण्यास मदत होते. दिवसानुसार टिळक लावल्यास शुभ फळ मिळते. असे मानले जाते की, सोमवारी श्वेत चंदनाचा तिलक लावल्याने मन शांत राहते. दुसरीकडे, मंगळवारी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळणे शुभ असते. बुधवारी कोरडे सिंदूर लावल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होते. गुरुवारी पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

शुक्रवारी लाल चंदन किंवा कुंकुम तिलक लावल्याने घरात समृद्धी येते. शनिवारी भस्म तिलक लावल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. रविवारी लाल चंदन लावल्याने व्यक्तीला मान-सन्मान आणि धनाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार जो व्यक्ती चंदनाचा टिळक लावतो त्याच्या घरात अन्न-धान्य आणि सौभाग्य वाढते.

टिळक लावण्याचे वैज्ञानिक महत्त्व

शास्त्रीय आधारावरही टिळकांचा आचरण करण्याचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर टिळक लावल्याने मेंदूला शीतलता मिळते असे म्हणतात. त्यामुळे माणसाला एकाग्रता साधणे सोपे जाते. असे म्हणतात की कपाळावर टिळक लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आपले निर्णय अगदी ठामपणे घेतो. चंदनाचा तिलक लावल्याने मेंदूला थंडावा मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.