AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Upay : तुळशीच्या पानांच्या या उपायांनी चमकेल भाग्य, कधीच भासणार नाही धन धान्याची कमतरता

तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. ज्या घरात तुळशीचा वास असतो, त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो.

Tulsi Upay : तुळशीच्या पानांच्या या उपायांनी चमकेल भाग्य, कधीच भासणार नाही धन धान्याची कमतरता
तुळशी उपायImage Credit source: Social Media
| Updated on: May 21, 2023 | 3:37 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पूजनीय मानले जाते. असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं, त्या घरात देवी-देवतांची कृपा असते, त्यामुळे घरात सुख-शांती नांदते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. ज्या घरात तुळशीचा वास असतो, त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो आणि वाईट शक्ती इकडे तिकडे फिरकत नाहीत. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास असतो. तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मकता येते. असे म्हणतात की जिथे सकारात्मकता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. ज्योतिष शास्त्रात तुळशीच्या रोपाचे काही उपाय (Tulsi Upay) सांगण्यात आले आहेत. तुळशीच्या पानांचे काही उपाय माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलतात. जाणून घेऊया तुळशीचे चमत्कारिक उपाय.

 तुळशीच्या पानांचे हे उपाय

  • दारिद्य दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विशेष पूजेसोबत तुळशीची पूजा करावी. तुळशीच्या पूजेमध्ये दिवा लावा आणि मधाच्या वस्तू अर्पण करा.  कच्चे दूध आणि मिठाई अर्पण करा. पूजेनंतर गरीब विवाहित महिलेला या वस्तू दान करा. या उपायाने दारिद्य दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते. यासोबतच तुळशीला गूळ अर्पण केल्याने दारिद्य दूर होऊन घरात सुख-शांती राहते.
  •  एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येत असेल तर सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा, वाईट वेळ दूर होईल. माणसाला चांगले दिवस येतात.
  • पैशाची समस्या दूर करण्यासाठी पितळेच्या भांड्यात पाणी घ्या, आता त्यात तुळशीची चार पाने टाका. दिवसभर हे पाणी असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी संपूर्ण घरावर शिंपडावे. यामुळे पैशाची समस्या लवकरच दूर होईल.
  • दुसरीकडे, जर कोणाचे लग्न होत नसेल तर त्याने रोज तुळशीला जल अर्पण करावे. यासोबतच तुमची इच्छा बोलून लवकरच लग्नाचे योग निर्माण होऊ लागतात.
  • कोणत्याही गुरुवारी तुळशीची पाने तोडून भगवान विष्णूला अर्पण करा. यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल आणि पैशाची कमतरता भासणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच..
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच...