AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर

वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे.

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर
Vishnu And mahadev
| Updated on: Apr 28, 2021 | 12:25 PM
Share

मुंबई : वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे. पूजा आणि इतर धार्मिक कार्यात वैशाख महिना खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात दान, याशिवाय गंगा स्नान करुन भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने त्रिदेवचा आशीर्वाद प्राप्त होतो (Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life).

वर्षातून एकदा वैशाख महिन्यात भाविकांना बांकेबिहारीचे दर्शनही दिले जाते. तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालू असल्यास, वैशाख महिन्यात भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा. यामुळे सर्वात मोठ्या संकटांवरही मात करता येते.

अशाप्रकारे उपासना केल्यास संकट दूर होतील

या संपूर्ण महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचं पठन करा. गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रुप असल्याचे वर्णन केले आहे. शिव मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या.

शिवलिंगाला पाणी अर्पण करा

या संपूर्ण महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो.

पारद शिवलिंगाला पंचामृताने स्नान करा

जर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षच्या जपमाळेसह 108 वेळा शिव मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

रोगापासून मुक्त होण्यासाठी

कोरोना काळात घरोघरी लोक त्रस्त आहेत. या रोगाने अनेक कुटुंबांना वेढा घातला आहे. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येमुळे किंवा इतर कुठल्याही आजारामुळे त्रास होत असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळे तिळ घाला आणि शिवलिंगावर अर्पित करा. याचा चमत्कारी परिणाम समोर येतो.

Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.