Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर

वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे.

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर
Vishnu And mahadev
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 12:25 PM

मुंबई : वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे. पूजा आणि इतर धार्मिक कार्यात वैशाख महिना खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात दान, याशिवाय गंगा स्नान करुन भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने त्रिदेवचा आशीर्वाद प्राप्त होतो (Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life).

वर्षातून एकदा वैशाख महिन्यात भाविकांना बांकेबिहारीचे दर्शनही दिले जाते. तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालू असल्यास, वैशाख महिन्यात भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा. यामुळे सर्वात मोठ्या संकटांवरही मात करता येते.

अशाप्रकारे उपासना केल्यास संकट दूर होतील

या संपूर्ण महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचं पठन करा. गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रुप असल्याचे वर्णन केले आहे. शिव मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या.

शिवलिंगाला पाणी अर्पण करा

या संपूर्ण महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो.

पारद शिवलिंगाला पंचामृताने स्नान करा

जर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षच्या जपमाळेसह 108 वेळा शिव मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

रोगापासून मुक्त होण्यासाठी

कोरोना काळात घरोघरी लोक त्रस्त आहेत. या रोगाने अनेक कुटुंबांना वेढा घातला आहे. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येमुळे किंवा इतर कुठल्याही आजारामुळे त्रास होत असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळे तिळ घाला आणि शिवलिंगावर अर्पित करा. याचा चमत्कारी परिणाम समोर येतो.

Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.