AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पुजेच्या दिव्यानेही दूर होतात अनेक समस्या, हे आहेत प्रभावी उपाय

कोणत्याही वास्तू शास्त्रानुसार (Vastu Tips) पूजेमध्ये दिवा लावणे आवश्यक मानले जाते. ज्याप्रमाणे रात्री दिवा लावल्याने अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे देवपूजेने दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो.

Vastu Shastra : पुजेच्या दिव्यानेही दूर होतात अनेक समस्या, हे आहेत प्रभावी उपाय
वास्तू शास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 28, 2023 | 4:33 PM
Share

मुंबई : सनातन परंपरेत देवाची नित्य उपासना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या पूजेसाठी वेगवेगळे विधी सांगितले गेले आहेत, परंतु त्या सर्वांच्या पूजेमध्ये एक गोष्ट समान आहे. कोणत्याही वास्तू शास्त्रानुसार (Vastu Tips) पूजेमध्ये दिवा लावणे आवश्यक मानले जाते. ज्याप्रमाणे रात्री दिवा लावल्याने अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे देवपूजेने दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो. यामुळेच कोणत्याही पूजा किंवा शुभ कार्यापूर्वी विशेष दिवा लावला जातो. जाणून घेऊया कोणत्याही शुभकार्यात किंवा देवी-देवतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्यासंबंधीचे उपाय आणि आवश्यक नियम.

दिवा संबंधित परिपूर्ण उपाय

  1. जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची रोज नियमानुसार पूजा करा. यासोबतच घराच्या मुख्य दाराजवळ रोज तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख समृध्दी नांदते.
  2. जर तुमच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असेल तर पिठाच्या चारमुखी दिव्यात तेल टाकून तो रोज लावावा. असे केल्याने ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून, विशेषत: साडेसातीच्या त्रासापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
  3. जर तुमच्या घरात नेहमी भांडण होत असेल किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात असेल तर दररोज घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला दिवा लावा. दारात ठेवलेल्या दिव्यात नेहमी शुद्ध तूप वापरावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने सुख-समृद्धी मिळते.
  4. घरामध्ये पूजा करताना देवघरात दिवा लावताना लक्षात ठेवा की दिव्याची ज्योत पूर्वेकडे असावी. दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला नसावी. वास्तूनुसार हा दोष मानला जातो.
  5. पूजा करताना लक्षात ठेवा की तुटलेले किंवा वापरलेले दिवे वापरू नयेत. हे देखील लक्षात ठेवा की ते मातीचे बनलेले असल्यास, ते केवळ एकदाच वापरावे. त्याचा वारंवार वापर टाळावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.