AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड मेहनत करतात, खूप पैसा कमावतता. परंतु त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतात. ते दूर करण्यासाठी वस्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 5:51 PM
Share

अनेकांसोबत असं घडतं की, ते लोक प्रचंड मेहनत करतात. दिवसरात्र कष्ट करतात. खूप धन कमावतात. परंतु त्यांच्या हातात पैसे टिकत नाहीत. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामे असते. त्यामागे विविध कारणे असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुमच्या घरात ही समस्या निर्माण होते. तुमच्या घरात पैसा टिकत नाही. घरात पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

घराची उत्तर दिशा – तुमच्या घराची उत्तर दिशा ही सर्वात महत्त्वाची असते, या दिशेला धनाची दिशा देखील म्हटलं जातं. त्यामुळे या दिशेला जर काही वास्तुदोष असेल तर त्यामुळे धन प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात. या दिशेचा दोष दूर करणं गरजेचं असतं. तसेच ही दिशा धनाची देवता कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला नेहमी कुबेरांचा फोटो लावावा, तसेच उत्तर दिशेला कोणत्याही प्रकारची अडचण असू नये, रद्दी किंवा अवजड सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घरात लक्ष्मी मातेचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो असावा. लक्ष्मी मातेची दररोज पूजा ही झालीच पाहिजे, तसेच लक्ष्मीमातेला दररोज एक लाल फूल किंवा झेंडूचं फूल अर्पण करावं, यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात.

संधैव मिठाचा उपाय – वास्तुशास्त्रामध्ये संधैव मिठाला प्रचंड महत्त्व आहे. दररोज सकाळी संधैव मीठ मिश्रीत पाण्याने घराचा उंबरा हा पुसून घ्यावा, त्यामुळे घराला बरकत प्राप्त होते, सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)  

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती