AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, व्यवसायामध्ये अडचणी येतायेत? मग करा हे तीन सोपे उपाय

अनेकांसोबत असं होतं की, हातात आलेला पैसा टिकत नाही. तो कोणत्या न कोणत्या कारणांसाठी खर्च होतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही, त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, व्यवसायामध्ये अडचणी येतायेत? मग करा हे तीन सोपे उपाय
VASTUSHTRA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 8:00 PM
Share

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमावतात, परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही. घरी पैसा आला की तो कोणत्या न कोणत्या कारणासाठी लगेच खर्च होतो. तिजोरी नेहमी रिकामी राहते. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, जसं की तुमच्या हातात कधीही पैसा टिकत नाही, घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. व्यवसायामध्ये तोटा होतो. एवढंच नाही तर काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सारखी भाडंण होतात, ही स्थिती कोणत्याही घरासाठी चांगली नसते. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांमुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं जातं. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर – जर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल, तुमच्या हातात येणारा पैसा हा अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी तुमचा पगार झाल्यानंतर एक रुपयाचं, पाच रुपयांचं किंवा दहा रुपयांचं नाण लक्ष्मी मातेला आर्पण करा आणि त्यानंतर हे नाणं तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवून द्या, या उपायामुळे अनावश्यक खर्चावर तर नियंत्रण येईलच सोबतच तुमच्या हातात पैसा देखील टिकून राहील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आचानक धन लाभासाठी – जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक धन लाभाचा योग हवा असेल, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती व्हावी तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर शुक्रवारी दुर्गा मातेला जास्वंदींच्या फुलांची माळा अर्पण करावी, यामुळे दुर्गा मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप