Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 7:10 PM

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे. वास्तु शास्त्रात जे नियम सांगीतले आहेत, त्या नियमांचं पालन केल्यास तुमच्या घरातील वास्तु दोष दूर होऊन तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य, शांतता, स्थिरता येते. अन्यथा तुम्हाला कौटुंबीक पातळीवर, आर्थिक पातळीवर संकटाचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे.

अनेकदा लोक वास्तु शास्त्रामध्ये घराची रचना जशी सांगितली आहे, तसं आपलं घर बनवतात. मात्र घरातील वस्तू वास्तु शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील वस्तू योग्य जागी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या घरात आर्थिक स्थौर्य निर्माण व्हावं, घरातील अडचणी दूर व्हाव्यात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही बदल करावे लागतील.तुम्ही जर तुमच्या घरातील वस्तू या वास्तू शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते. जाणून घेऊयात नेमके काय बदल केले पाहिजेत?

वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरीचं तोंड हे नेहमी उत्तर -पूर्ण दिशेला म्हणजे इशान्य दिशेला असावं.उत्तर-पूर्व दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते. त्यामुळे तिजोरीचं तोंड हे ईशान्य दिशेला असणं शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला एखादी निसर्गाशी संबंधित जशी उगवत्या सुर्याची प्रतिमा लावणं शुभ मानलं जातं. तुमच्या घराच्या अग्नेय दिशेला एखादा लाल कलरचा बल्ब लावा. बाथरूममध्ये निळ्या कलरची बादली ठेवावी तसेच बाथरूमध्ये असलेले कोणतंही भांड हे रिकामं ठेवू नका, ते नेहमी पाण्यानं भरलेलं ठेवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....