AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा
| Updated on: Dec 05, 2024 | 7:10 PM
Share

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे. वास्तु शास्त्रात जे नियम सांगीतले आहेत, त्या नियमांचं पालन केल्यास तुमच्या घरातील वास्तु दोष दूर होऊन तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य, शांतता, स्थिरता येते. अन्यथा तुम्हाला कौटुंबीक पातळीवर, आर्थिक पातळीवर संकटाचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे.

अनेकदा लोक वास्तु शास्त्रामध्ये घराची रचना जशी सांगितली आहे, तसं आपलं घर बनवतात. मात्र घरातील वस्तू वास्तु शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील वस्तू योग्य जागी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या घरात आर्थिक स्थौर्य निर्माण व्हावं, घरातील अडचणी दूर व्हाव्यात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही बदल करावे लागतील.तुम्ही जर तुमच्या घरातील वस्तू या वास्तू शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते. जाणून घेऊयात नेमके काय बदल केले पाहिजेत?

वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरीचं तोंड हे नेहमी उत्तर -पूर्ण दिशेला म्हणजे इशान्य दिशेला असावं.उत्तर-पूर्व दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते. त्यामुळे तिजोरीचं तोंड हे ईशान्य दिशेला असणं शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला एखादी निसर्गाशी संबंधित जशी उगवत्या सुर्याची प्रतिमा लावणं शुभ मानलं जातं. तुमच्या घराच्या अग्नेय दिशेला एखादा लाल कलरचा बल्ब लावा. बाथरूममध्ये निळ्या कलरची बादली ठेवावी तसेच बाथरूमध्ये असलेले कोणतंही भांड हे रिकामं ठेवू नका, ते नेहमी पाण्यानं भरलेलं ठेवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.