AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे.

Vastu Tips : करा हा एक सोपा उपाय; झटक्यात दूर होईल वास्तु दोष, सदैव राहिल लक्ष्मीची कृपा
| Updated on: Dec 05, 2024 | 7:10 PM
Share

हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही एका योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे. वास्तु शास्त्रात जे नियम सांगीतले आहेत, त्या नियमांचं पालन केल्यास तुमच्या घरातील वास्तु दोष दूर होऊन तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य, शांतता, स्थिरता येते. अन्यथा तुम्हाला कौटुंबीक पातळीवर, आर्थिक पातळीवर संकटाचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे.

अनेकदा लोक वास्तु शास्त्रामध्ये घराची रचना जशी सांगितली आहे, तसं आपलं घर बनवतात. मात्र घरातील वस्तू वास्तु शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील वस्तू योग्य जागी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या घरात आर्थिक स्थौर्य निर्माण व्हावं, घरातील अडचणी दूर व्हाव्यात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही बदल करावे लागतील.तुम्ही जर तुमच्या घरातील वस्तू या वास्तू शास्त्रात सांगितलेल्या जागी ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते. जाणून घेऊयात नेमके काय बदल केले पाहिजेत?

वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरीचं तोंड हे नेहमी उत्तर -पूर्ण दिशेला म्हणजे इशान्य दिशेला असावं.उत्तर-पूर्व दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते. त्यामुळे तिजोरीचं तोंड हे ईशान्य दिशेला असणं शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला एखादी निसर्गाशी संबंधित जशी उगवत्या सुर्याची प्रतिमा लावणं शुभ मानलं जातं. तुमच्या घराच्या अग्नेय दिशेला एखादा लाल कलरचा बल्ब लावा. बाथरूममध्ये निळ्या कलरची बादली ठेवावी तसेच बाथरूमध्ये असलेले कोणतंही भांड हे रिकामं ठेवू नका, ते नेहमी पाण्यानं भरलेलं ठेवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.