AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: तुम्ही देखील स्वयंपाक घरात तिखट अन् मीठ एकाच जागेवर ठेवण्याची चूक करतायेत? जाणून घ्या वस्तुशास्त्र काय सांगतं

वास्तुशास्त्रानुसार कधीच तिखट, आणि मीठ एकत्र ठेवू नये, यामुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Tips: तुम्ही देखील स्वयंपाक घरात तिखट अन् मीठ एकाच जागेवर ठेवण्याची चूक करतायेत? जाणून घ्या वस्तुशास्त्र काय सांगतं
| Updated on: Sep 15, 2025 | 11:42 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर हे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. याच घरातून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ऊर्जा मिळते. त्यामुळेच स्वयंपाक घराला वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात जसं तुमचं स्वयंपाक घर असेल तसाच प्रभाव घरातील सदस्यांवर पडत असतो. जर तुमचं स्वयंपाक घर हे स्वच्छ असेल, तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा नसेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद राहतो, सुख शांती राहते आणि जर तुमचं स्वयंपाक घर हे अस्वच्छ असेल, तुम्ही जर तुमच्या स्वयंपाक घरात सामान कसंही अस्त-व्यस्त ठेवलेलं असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यावर देखील पाडतो. अनेकदा नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आयुष्य प्रभावीत होतं, घरात नकारात्मक शक्ति प्रवेश करते. जसं की घरात कधीच मीठ आणि तिखट एका जागेवर ठेवू नये, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

मीठ कुठे ठेवावं?

मीठाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. जर तुम्ही मीठ चुकीच्या जागी आणि चुकीच्या पद्धतीनं ठेवलं तर त्याचा परिणाम हा तुमच्या घरावर होतो, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मीठाला नेहमी काचेच्या भांड्यातच ठेवावे असा सल्ला दिला जातो. मीठ काचेच्या भांड्यात ठेवल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. चुकूनही मीठ लोखंडाच्या डब्यामध्ये ठेवू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात. मीठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नये, त्यामुळे घरात अडचणी वाढतात, वास्तुशास्त्रानुसार दर शुक्रवारी मीठाचा डबा भरू ठेवावा.

तिखट आणि मीठ एकाच जागी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार कधीच तिखट, आणि मीठ एकत्र ठेवू नये, यामुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. मीठ आणि तिखट एकत्र ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे नेहमी तिखट आणि मीठ हे वेगवेगळ्या जागी ठेवावेत.

हळदीचे नियम

वास्तुशास्त्रानुसार हळद फक्त एक तुमच्या घरात मसाल्यासाठी वापरला जाणारा पदार्थ नाहीये तर त्याचं अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे हळदीचं भांड देखील कधीच रिकामं ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार हळदीच्या डब्यामध्ये रुपयाचं एक नाण आणि तीन लवंगा ठेवल्यास विशेष लाभ मिळतो, घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष