AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी

वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात.

Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 10, 2023 | 9:26 AM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu Tips) स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. असे म्हणतात की ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि माता लक्ष्मी देखील स्वतः वास करते. वास्तूमध्ये घराचे असे काही कोपरे आणि सांगण्यात आले आहेत, जे स्वच्छ ठेवल्यास घराच्या या दिशांना देव वास करतात. वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात. शास्त्रात सांगितले आहे की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते आणि ज्या घरात या गोष्टींची काळजी घेतली जाते त्या घरात त्यांचा वास असतो.

उत्तर पूर्व

वास्तू तज्ञ सांगतात की घराचा किंवा ऑफिसचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. वास्तूमध्ये हे घराचे मुख्य स्थान मानले जाते. घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवाचा वास असतो असे म्हणतात. घराचा हा भाग स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते.

ब्रह्म स्थान

ब्रह्म स्थान देखील घरातील मुख्य स्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील ब्रह्म स्थान स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की घराच्या या ठिकाणी जड जागा किंवा कोणतीही निरुपयोगी वस्तू ठेवू नये.

पूर्व दिशा

ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीनुसार घराची पूर्व दिशा शुभ मानली जाते. घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि माता लक्ष्मीही खूप प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.