AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : महादेवाच्या मंदिरात अर्पण करा या सात वस्तू, आयुष्यच बदलून जाईल, तिजोरी धनाने भरेल

महादेवांना देवाचे देव म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून जातं. त्याच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastushastra : महादेवाच्या मंदिरात अर्पण करा या सात वस्तू, आयुष्यच बदलून जाईल, तिजोरी धनाने भरेल
MAHADEVImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:50 PM
Share

महादेवांना देवाचे देव म्हटलं जाते. जेव्हा तु्म्ही अंतकरणातून महादेवांची भक्ती करतात, प्रार्थना करतात, तेव्हा महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून जातं. त्याच्यावर येणारी सर्व संकट दूर होतात. आयुष्यात तो व्यक्ती यशस्वी होतो, असं हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्या उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही महादेवांना अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होतात. महादेवांच्या कृपेनं तुमच्या सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या मनाला अध्यात्मिक शांती लाभते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

बेलपत्र – महादेवांना बेलाची पानं ही अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगावर बेलाची पान अर्पण करू शकतात. यामुळे तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पांढरं फूल – वास्तुशास्त्रानुसार महादेवांना पांढरं फूल देखील अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दर सोमवारी महादेवांची पूजा करताना महादेवांना पांढरं फूल अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात. घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. महादेवांच्या कृपेनं तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत.

नवैद्य- दर सोमवारी महादेवांची पूजा करावी, पुजेनंतर महादेवांना फूलं अर्पण करावं आणि त्यानंतर नवैद्य अर्पण करावा. महादेवांना नवैद्य अर्पण केल्यानंतरच तुमची पूजा पूर्ण झाली असं मानलं जातं. नवैद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुजेचं अपेक्षित फळ मिळतं.

आत्तर – महादेवांना सुवासिक अत्तर अर्पण करावं , यामुळे महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.

पंचामृत – महादेवांना दर सोमवारी पंचामृत अर्पण करावे, यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात असं मानलं जातं.

दूध – महादेवांना दूध देखील अर्पण करावं, यामुळे घराला बरकत प्राप्त होते.

धूप – महादेवांना धूप अर्पण करावा, यामुळे महादेव प्रसन्न होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.