AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayaki Chaturthi : आज चैत्र विनायक चतुर्थी, या उपायांनी होतील सर्व मनोकामना पुर्ण

विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आज रवियोग, विजय मुहूर्त आणि निशिता मुहूर्त असे अनेक शुभ योग तयार होत आहेत.

Vinayaki Chaturthi : आज चैत्र विनायक चतुर्थी, या उपायांनी होतील सर्व मनोकामना पुर्ण
विनायक चतुर्थीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 25, 2023 | 8:40 AM
Share

मुंबई, चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी व्रत आज, शनिवार, 25 मार्च रोजी पाळण्यात येत आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार हिंदू धर्मातील कोणतेही शुभ कार्य गणेश पुजनाशिवाय पूर्ण होत नाही. यामुळेच श्रीगणेशाला प्रसन्न ठेवण्यासाठी सनातन धर्मात दर महिन्याला विनायक चतुर्थी (Vinayaki Chaturthi March 2023) व्रत पाळली जाते. गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तापासून संकटे कोसो दूर राहातात. या दिवशी केलेले काही उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात.

विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त

चैत्र, शुक्ल चतुर्थी सुरू होते – 24 मार्च, 04:59 pm समाप्ती – 25 मार्च, 04:23 PM गणपतीच्या पूजेची वेळ – सकाळी 11.13 ते दुपारी 1.40 पर्यंत

विनायक चतुर्थीला शुभ योग

विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आज रवियोग, विजय मुहूर्त आणि निशिता मुहूर्त असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. आज सकाळी 6.19 पासून रवियोग सुरू झाला असून तो दुपारी 1.19 पर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी 2.29 पासून सुरू होईल आणि 3.18 पर्यंत चालेल. दुसरीकडे, निशिता मुहूर्त 26 मार्च रोजी सकाळी 12.03 ते 26 मार्च रोजी पहाटे 12.50 पर्यंत असेल.

विनायक चतुर्थी पूजा विधी

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर गणेशाची आराधना सुरू करा. या दिवसाच्या पूजेत नारळ आणि मोदक यांचा समावेश करावा. याशिवाय पूजेत गणेशाला गुलाबाचे फूल आणि दूर्वा अर्पण करा. धूप, दिवा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. गणपतीची कथा वाचा, आरती करा, पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा.

विनायक चतुर्थीसाठी उपाय

जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशासमोर गोल दिवा लावा. याशिवाय तुमच्या वयाच्या आकड्यानुसार पुजेत लाडूचा नैवेद्य अर्पण करा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि बाकीचे इतरांना वाटून घ्या. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचा 3 वेळा पठण करा.

या दिवसाच्या पूजेमध्ये गणेशाला दुर्वा माळा अर्पण करा. त्यांना तूप आणि गूळ अर्पण करा. पैसे मिळावे म्हणून प्रार्थना करा. पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला. हे पाच विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे.

आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी या दिवसाच्या पूजेत गणपतीला पाच मोदक, पाच लाल गुलाब आणि दूर्वा अर्पण करा. शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. या पूजेनंतर एक मोदक तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून खायला द्या आणि उरलेले मोदक इतर मुलांना किंवा गरजूंना वाटून द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?