AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | व्यवसायात भरघोस यश मिळवायचंय? मग, चाणक्यंनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) एक महान विद्वान होते. ते मुत्सद्दीपणा आणि राजकारणाचे कुशल जाणकार होते. आचार्य चाणक्य यांना विष्णू गुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जात असे. आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्याला आपल्या मुत्सद्देगिरीने सम्राट बनवले.

Chanakya Niti | व्यवसायात भरघोस यश मिळवायचंय? मग, चाणक्यंनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) एक महान विद्वान होते. ते मुत्सद्दीपणा आणि राजकारणाचे कुशल जाणकार होते. आचार्य चाणक्य यांना विष्णू गुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जात असे. आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्याला आपल्या मुत्सद्देगिरीने सम्राट बनवले. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक ग्रंथ लिहिले. पण आजही लोकांना त्यांनी लिहिलेले नीतिशास्त्र वाचायला आवडते.

चाणक्य यांनी नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की, ज्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, त्यांनी ‘या’ चार गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर ‘या’ चार गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

कामाची शिस्त

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे आहे, त्याच्या जीवनात शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. शिस्त ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. त्याचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात कठोर परिश्रमाची भावना विकसित होते. यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमध्ये शिस्त असणे आवश्यक आहे.

जोखीम घेण्याचे धैर्य

चाणक्य नीतिमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी धोकादायक निर्णय घेण्याची अर्थात जोखीम घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. चाणक्याच्या मते, केवळ ती व्यक्ती यशस्वी होते, जी अपयशाला घाबरत नाही. ज्या व्यक्तीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते, तो नेहमीच यशस्वी होतो.

कुशल वर्तन

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीसाठी नोकरी किंवा व्यवसायात कार्यक्षम वर्तन असणे अत्यंत आवश्यक आहे. चाणक्य म्हणतात की, ज्यांच्या बोलण्यात गोडवा आहे ते कठोर माणसाचे मन देखील बदलतात. जे बोलण्यामध्ये श्रीमंत आहेत, ते प्रत्येकाला प्रभावित करतात. यामुळे लोकांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळते. याशिवाय जे लोक शब्दांनी समृद्ध असतात, त्यांना नेहमीच लोकांकडून आदर मिळतो.

सांघिक कार्याची (टीम वर्क) भावना

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणतीही व्यक्ती एकट्याने यशस्वी होऊ शकत नाही. ज्यांना प्रत्येकाला बरोबर घेण्याची गुणवत्ता आहे, त्यांनाच आयुष्यात-व्यवसायात यश मिळू शकते. यश मिळवण्यासाठी खूप लोकांची आवश्यकता लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सर्वांना सोबत घेतले, तर आयुष्यात यशस्वी होऊन कोणतेही काम करू शकता. या दरम्यान, आपण संयम आणि विश्वास राखला पाहिजे.

हेही वाचा :

Lucky mole signs : भाग्यवान असतात ‘या’ ठिकाणी तीळ असलेले लोक, ऐशोआरामाचे आयुष्य जगतात

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पाला कोणती फुलं वाहावी आणि कोणती वाहू नये

Chanakya Niti | अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी कुठली ना कुठली समस्या असते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल

कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.