AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी आहे माघ पौर्णिमा? जाणून घ्या काय आहे माघ पौर्णिमेला स्नान आणि दानाचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तिथी विशेष मानली जाते. माघ महिन्यात येनाऱ्याला पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी गंगास्नान आणि दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे.

कधी आहे माघ पौर्णिमा? जाणून घ्या काय आहे माघ पौर्णिमेला स्नान आणि दानाचे महत्त्व
Magh Purnima 2025Image Credit source: Tv9 Bharatvarsh
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 02, 2025 | 3:20 PM
Share

हिंदू धर्म शास्त्रामध्ये पौर्णिमा तिथिला विशेष महत्त्व आहे. साधारणपणे एका वर्षात बारा अमावस्या असतात आणि एका वर्षात अधिकमास असल्यास त्या वर्षी तेरा पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेला स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी जगाचे रक्षक विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.

हिंदू धर्मानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या पूजेसह गंगा स्नान केल्या जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊ कधी आहे माघ पौर्णिमा? आणि माघ पौर्णिमेचे महत्त्व.

कधी आहे माघ पौर्णिमा?

यावर्षी माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 मिनिटांनी संपेल. हिंदू धर्मात तिथी सूर्योदयानुसार ठरवली जाते. त्यामुळे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारीला आहे.

का आहे माघ पौर्णिमा विशेष?

माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.

गंगा स्नानाचे महत्त्व

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्थान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते.

दान करण्याचे महत्त्व

गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.