AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत कधी? तारीख आणि शुभ वेळ काय? जाणून घ्या

फेब्रुवारी महिन्याचा पहिला शनि प्रदोष कधी आहे? व्रताची तसेच पूजेचा शुभ मुहूर्त आणि शनि दोषापासून मुक्तता मिळविण्यासाठी कोणते विशेष उपाय करावे याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत कधी? तारीख आणि शुभ वेळ काय? जाणून घ्या
Shani Pradosh
| Edited By: | Updated on: Feb 05, 2026 | 2:02 PM
Share

हिंदू धर्मात प्रदोष व्रत हा भगवान शंकर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. जेव्हा हे व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत असे म्हणतात. तर फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे. ज्यांना शनीच्या साडेसाती किंवा धैय्यामुळे होणारा त्रास यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा ज्यांना यश मिळण्यासाठी त्यांच्या जीवनात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. चला तर मग आजच्या लेखात शनी प्रदोष व्रताची योग्य वेळ तारीख आणि या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दल जाणून घेऊयात.

तारीख आणि शुभ वेळ

धार्मिक दिनदर्शिका आणि गणनेनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 14 फेब्रुवारी 2026 रोजी येते. प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताचे सर्व दुःख दूर होतात.

तर शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर प्रदोष व्रत पूजा संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू करावी. ही पूजा रात्री 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत करता येणार आहे. तर या दिवशी संध्याकाळी सुमारे 2 तास 34 मिनिटे हा पूजेसाठी शुभ काळ मानला जाणार आहे.

शनि प्रदोषाचे विशेष महत्त्व

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि शनि देव दोघांचीही पूजा केली जाते. पुराणकथा आणि श्रद्धांनुसार भगवान शिव हे शनि देवाचे गुरु आहेत. म्हणूनच शनि प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने शनि देव तुम्ही केलेल्या व्रतामुळे शांत आणि प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्र मानते की या दिवशी उपवास केल्याने संततीचे आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांच्या शापांपासून मुक्ती मिळते.

सौभाग्य मिळण्यासाठी करा हे खास उपाय

जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत प्रगती करायची असेल किंवा दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण करायची असतील, तर विद्वानांनी सुचवलेले हे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.

  • एका कांस्याच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा आणि ते तेल गरजू व्यक्तीला दान करा.
  • पिंपळाच्या झाडाची पूजा: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
  • शिव अभिषेक: कच्च्या दूधात काळे तीळ मिक्स करून हे दूध शिवलिंगावर अर्पण करा .

पूजा करताना ही काळजी घ्या

धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी मीठ सेवन करू नये. पूजा करताना मन शांत ठेवा आणि “ओम शं शनैश्चराय नम:” सोबत “ओम नम: शिवाय” या मंत्राचाही जप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.