AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 एकादशीपैंकी सर्वात मोठी कोणती, यावर्षी त्याचे व्रत कधी पाळले जाईल? जाणून घ्या

एकादशीचे व्रत आणि त्यासोबत भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद मिळतो. त्यातच वर्षातून एकूण 24 एकादशी व्रत येतात. तर अनेकदा असा प्रश्न पडतो की या एकादशी व्रतांपैकी सर्वात मोठी एकादशी कोणती? तर आजच्या लेखात सर्वात मोठ्या एकादशी व्रताबद्दल तसेच या वर्षी कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊयात.

24 एकादशीपैंकी सर्वात मोठी कोणती, यावर्षी त्याचे व्रत कधी पाळले जाईल? जाणून घ्या
Ekadashi
| Edited By: | Updated on: Jan 12, 2026 | 11:19 PM
Share

आपल्या सनातन धर्मात एकादशीची तिथी खूप खास मानली जाते. ही तिथी जगाचे पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूला समर्पित असल्याने अनेक भाविकभक्त प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचे मनोभावे पूजा करतात. तर एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपवास केला जातो. वर्षभरात 24 एकादशी व्रत असतात. पहिली एकादशी महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. मान्यतेनुसार एकादशी हे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्याचा एक विशेष प्रसंग आहे. या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो.

एकादशीचा उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते. संकटे दूर होतात. शिवाय मृत्यूनंतर एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष मिळतो आणि भगवान विष्णूच्या वैकुंठ स्थानी स्थान मिळते. तथापि अनेक लोकांना प्रश्न पडतो की 24 एकादशी व्रतांपैकी कोणती एकादशी व्रत सर्वात महत्वाची आहे? चला सर्वात महत्वाच्या एकादशी व्रताबद्दल तसेच या वर्षी तो कधी साजरी केली जाईल ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

निर्जला एकादशी

धार्मिक शास्त्रांनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते. या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. या एकादशीला व्रत करणारी व्यक्ती पाणी देखील पित नाही, म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात. असे मानले जाते की निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीच्या व्रतांचे फळ मिळते. या वर्षी निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी केली जाईल.

देवउठनी एकादशी

देवउठनी एकादशीला देवोत्थान किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात उज्ज्वल पंधरवड्यात येते. हा दिवस भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतात म्हणजेच या एकादशीच्या दिवशी चातुर्मास संपतो. त्यानंतरच शुभ आणि मागंलिक कार्ये पुन्हा सुरू करता येतात. म्हणूनच ही एक महत्त्वाची एकादशी मानली जाते. या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी व्रत आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!